HW News Marathi
देश / विदेश

काही नेते आपण काँग्रेसी असल्याचा फक्त दावा करतात !

मुंबई | मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करून मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते भाई जगताप यांनी निरुपम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “काही नेते आपण काँग्रेसी असल्याचा फक्त दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात ते जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात”, असे म्हणत भाई जगताप यांनी संजय निरुपम यांना घरचा आहेर दिला आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमुळे मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

“काही नेते हे केवळ आपण काँग्रेसी असल्याचा दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात ते जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात. अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि पुन्हा त्यांच्याच मतदारसंघातून लढतात. एवढे करूनही शेवटी ते तब्बल २.७ लाख मतांनी पराभूत होतात. आपल्याला अशा ‘कर्मठ’ नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे”, अशा आशयाचे ट्वीट करत भाई जगताप यांनी संजय निरुपम यांना जोरदार टोला लगावला आहे.

संजय निरुपम यांची मिलिंद देवरांवर टीका

“कोणत्याही पदाचा राजीनामा देणे ही केवळ त्यागाची भावना असते. मात्र, इथे तर राष्ट्रीय पदाची मागणी केली जाते. हा राजीनामा आहे की उच्च पद मिळावे यासाठी केलेला प्रयत्न ?”, असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रामणे “अशा स्वार्थी आणि कर्मठ लोकांपासून सावध राहायला हवे”, असे देखील निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी संजय निरुपम यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोलच्या किंमतीत वाढ कायम, डिझेलच्या किंमती स्थिर

Gauri Tilekar

कोरोनामूळे नाईलाजास्तव घरी बसलेल्या रेल्वेतील कंत्राटी कामगारांना पूर्ण पगार मिळणार

swarit

निर्भया प्रकरणातील आरोपीची फाशीची शिक्षा कायम

News Desk