HW News Marathi
Covid-19

मुंबई-दिल्ली सोडून आपल्या राज्यात जाणाऱ्या मजुरांना Spicejet विमानाने पोहोचवणार !

दिल्ली | देशभरात लॉकडाऊन दरम्यान दिल्ली आणि मुंबई येथून आपापल्या राज्यात पायपीट करत जाणाऱ्या लोकांचे फोटो समोर येत आहेत. यामध्ये काही मजुरांचा पायी प्रवास करताना मृत्यु झाल्याने प्रशासनासमोर चिंता वाढली आहे.अशा परिस्थितीत स्पाइसजेट या खासगी विमान कंपनीने सरकारला मदतीची ऑफर दिली आहे. दिल्ली आणि मुंबईहून बिहारमध्ये स्थलांतरित होणाऱ्या लोकांना आपण पोहोचवू असे म्हणतं स्पाइसजेटने हवाई प्रवासाची ऑफर दिली आहे.

एअरलाइन्सचे सीएमडी अजय सिंह म्हणाले, “२१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान स्पाइसजेट आपल्या विमान आणि विमानातील सर्व सदस्यांची सेवा सरकारला देण्यास तयार आहे. तर जे कामगार स्थलांतरित आहेत त्यांच्यासाठी, विमान कंपनी दिल्ली आणि मुंबईहून पाटण्याला काही उड्डाणे करण्यास तयार आहे. यामुळ् लोकांना त्रास सहन करावा लागू नये.

देशामध्ये सध्या २१ दिवसांचा लाॅकडाऊन आहे,त्यामुळे 14 एप्रिल रोजी मध्यरात्रीपर्यंत आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे कोरोनो व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी इंडिगो आणि गोएअरच्या वतीनेसुद्धा कोणतीही आवश्यकता असेल तर सरकारला मदत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनची नवी नियमावली आजपासून लागू

News Desk

कल्याण डोंबिवलीत ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ! जाणून घ्या नवी नियमावली…

News Desk

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५ लाखांच्या पार

News Desk