HW News Marathi
देश / विदेश

अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद

नवी दिल्ली | व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. आपत्कालीन स्थितीत सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांमुळे तणावात भर पडू नये, म्हणून सरकारने थेट सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत विचार करत आहे.

व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर प्रतिबंध लादले जातील, असे दूरसंचार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. विशिष्ट भागात तणाव वाढत असेल तर किंवा आणीबाणीची स्थिती उत्पन्न होत असेल. तेव्हा त्या भागातील सोशल मीडिया बंद करण्याचा विचार सरकार करत आहे. तणवाच्या स्थितीत इंटरनेट सुरू असेल, परंतु सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी आणण्याबाबतच्या पर्यायावर विचार सुरू आहे.

दूरसंचार विभागाने १८ जुलै रोजी या संदर्भातील पत्र टेलकॉम ऑपरेटर, भारतीय इंटरनेट सेवा प्राधिकरण, सेल्युलर ऑपरेटर्स एसोसिएशन ऑफ इंडियाला पाठवले होते. त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षेला धोका किंवा शांतता भंग होत असेल. तेव्हा अशा वेळी सोशल मीडिया बंद ठेवण्याबद्दलचा विचार केला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळमध्ये एका दिवसात पावसाचे १०६ बळी

News Desk

७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज राजपथावर देशाच्या संस्कृती आणि ताकदीचे दर्शन होणार

Aprna

येत्या ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड ‘आधार’शी लिंक करणे बंधनकारक

News Desk