HW News Marathi
देश / विदेश

राफेल प्रकरणी केंद्र सरकारला मोठा धक्का, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

नवी दिल्ली | राफेल डील प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवर आज (१० एप्रिल) झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळला आहे. तर कोर्टात सादर करण्यात आलेली कागदपत्रे वैध असल्याचे म्हटले आहे.

राफेल व्यवहार प्रकरणी दिलेल्या निकालावर भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर सरकारने या याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. त्यावर आज न्यायालयाने फैसला दिला.

याआधी ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरीला गेल्याचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. त्यानंतर वेणुगोपाल यांनी केलेल्या वक्तव्यावर यू टर्न घेताना मंत्रालयातून कागदपत्रे चोरी झाली नसल्याचा दावा केला होता. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे प्रकाशित करू शकत नाही, असे ॲटर्नी जनरल यांनी याआधी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनोहर पर्रिकर यांना रुग्णालयात केले दाखल

swarit

दावोस येथील परिषदेत ब्रिटीश कंपनीशी सकारात्मक चर्चा

Adil

‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ १५ फेब्रुवारीला धावणार

News Desk