HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली | बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहे. लालू यांनी प्रकृतीचे कारण देत जामीन अर्ज केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज(१० एप्रिल) सुनावणीत लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळून लावली आहे.

न्यायालयाने जामीन याचिका फेटाळल्यामुळे पहिल्यांदा लालू लोकसभा निवडणुकीच्या सहभागी होता येणार नाही. निवडणुकीत लालू यांचे दोन मुलांमध्येही एकमत नसल्‍याचे चित्र सध्या दिसत आहे. लालूचा मोठा मुलगा तेज प्रताप याने राजद विरोधात लालू राबडी असा नवीन मोर्चा उघडला आहे. लालू यांच्या जामीन याचिकेला सीबीआयने विरोध केला. चारा घोटाळ्याप्रकरणी लालूला २७ वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.

मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर लालू प्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने सुनावणी झाली आहे. लालू यादव हे गेल्या ८ महिन्यांपासून रुग्णालयामध्ये आहेत. लालू यांना रुग्णालयामध्ये राहण्यासाठी विशेष सुविधा दिली जात आहे. तसेच त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लालू यांना१९७७ सालानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकणार नाहीत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू यांनी आपल्या पार्टीसाठी प्रचार केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विवाह बाह्य संबंध आता अपराध नाही, कलम ४९७ रद्द

News Desk

राजस्थानमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार, १५ मंत्री घेणार शपथ

News Desk

कर्नाटक विधानसभेत बीएस येडियुरप्पा यांनी सिद्ध केले बहुमत

News Desk