HW News Marathi
Covid-19

देशाला आर्थिक पॅकेजची गरज, यूपीए सरकारच्या काळातील योजना चांगल्या !

नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (५ मे) नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी खास बातचीत केली. देशाला आर्थिक पॅकेज गरज असल्याचे अभिजीत बॅनर्जींनी सांगितले. अमेरिका आणि जापानसारख्या देशांनी देखील आर्थिक पॅकेज दिल्याचे बॅनर्जींनी राहुल गांधींशी बोलताना सांगितले.

तसेच यूपीए सरकारच्या योजना चांगल्या आहेत, मोदी सरकार त्या योजना योग्य पद्धतीने लागू करत नल्याचे अभिजीत बॅनर्जी म्हणाले. अभिजीत बॅनर्जी म्हणाले, अर्थव्यवस्था ठप्प असताना लोकांच्या हाती थेट पैसा देणे योग्य नाही. उत्पादन आणि मागणी यामधील अंतर वाढल्यास महागाई वाढेल. त्यामुळे सरकारने आता लोकांच्या हाती पैसा न देता दोन महिन्यांनंतर द्यावा. लॉकडाऊन संपल्यानंतर तो लोकांना खर्च करता येईल.

देशाला आर्थिक पॅकेजची गरज

कोरोना संकटानतर देशातील बँकांसमोर मोठ्या समस्या वाढणार आणि तसेच नोकऱ्या वाचवणेही कठीण होऊन बसते, राहुल गांधींच्या प्रश्नावर बोलताना बँनर्जी म्हणाले, “देशाला आर्थिक पॅकेजची गरज आहे. अमेरिका, जपानने अशा पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र आपल्याकडे अद्याप अशा प्रकारच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली नाही. लहान उद्योगांना आर्थिक मदतीची गरज असून चालू तिमाहीचे कर्ज माफ करण्यात यावे, असे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.”

यूपीए सरकारच्या योजना चांगल्या आहेत

यूपीए सरकारच्या काळातील योजना चांगल्या आहेत. मात्र, आता मोदी सरकार त्या योजना योग्य पद्धतीने लागू करत नसल्याचे बॅनर्जींनी सांगितले. मोदी सरकारने यूपीए सरकारच्या ज्या चांगल्या होत्या. त्या योजनांवर सरकारने काम करून पुढे नेहले पाहिजे. यावेळी बॅनर्जींनी आधार कार्डचा संदर्भ दिला. यूपीए सरकारच्या काळातील अनेक योजना कोरोनाच्या संकट काळात उपयोगी ठरू शकतात, असे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० लाख कोटींमध्ये किती शून्य ? अर्थमंत्र्यांचीच झाली तारांबळ

News Desk

कापूस खरेदी केंद्रांना सहकार्य करा, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

News Desk

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk