HW News Marathi
देश / विदेश

सरन्यायाशीध आणि न्यायमूर्ती यांच्या वादा मिटला

दिल्ली – सुप्रीम कोर्टमधील ४ न्यायमूर्तींनी १२ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन कोर्टाचे कामकाज योग्य पद्धतीने चालत नसल्याचे आरोप या न्यायमूर्तींनी केले होते. सुप्रीम कोर्टचे बार काऊन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्या मध्यस्थितीने सरन्यायधीश आणि न्यायमूर्ती यांच्यामधील वादा मिटला. अटॉर्नी जनरल के. के. वेगुगोपाल आणि चार न्यायमूर्ती यांची भेट झाल्यानंतर हा वाद मिटल्याचे कळते.

तसेच सुप्रीम कोर्टात पुन्हा सामान्य पद्धतीने कामे सुरू झाली आहेत. तसेच न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनर तोडगा काढण्यात येईल असे मनन कुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही वाद मिटला असल्याचे सांगितले. या भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती. कुरियन जोसेफ, रंजन गोगोई, जे. चेलमेश्वर आणि मदन लोकूर या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राफेल प्रकरणी केंद्र सरकारला मोठा धक्का, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

News Desk

“…एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही”, अमित शाहांचा चीनला इशारा

Aprna

अफजल गुरूच्या मुलाने केंद्रांकडे केली पासपोर्टची मागणी

News Desk
राजकारण

अमेठीत राहुल गांधी राम तर मोदी रावणाच्या रुपातील पोस्टर वॉर

swarit

लखनऊ – राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यनंतर पहिल्यांदा त्यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीच्या १५ ते १६ जानेवारी रोजी असा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. यावेळी या राहुल गांधीच्या दौऱ्यानिमित्ताने एक वादग्रस्त पोस्टर अमेठीत लावण्यात आले आहे. एका पोस्टरमध्ये राहुल गांधी राम तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या रुपात दाखविण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाकडून २०१९च्या लोकसभा निवडणुकीतच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. या दौऱ्यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणार असून तसेच सात ठिकाणी राहुल गांधी रोड शो आणि पदयात्रा काढणार आहेत.

तसेच दुसऱ्या पोस्टरमध्ये राहुल गांधी श्रीकृष्णाच्या आवतारात दाखविण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसची पोस्टरबाजी सर्वत्र चर्चा रंगली आहे. आता भाजपकडून काय उत्तर देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या गैरहजेरीबाबत न्यायालयाची तीव्र नाराजी

News Desk

प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातील सर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत! – नरेंद्र मोदी

News Desk

दिल्लीत संजय राऊतांच्या घरी मेजवानी..भाजप खासदार जाणार ?

News Desk