HW News Marathi
देश / विदेश

ते आता पप्पू राहिले नाहीत, गाढवांचे सम्राट झाले आहेत !

नवी दिल्ली | “राहूल गांधी हे आता पप्पू राहिले नाहीत. ते आता गाढवांचे सम्राट झाले आहेत”, अशी टीका भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी केली आहे. आकाश विजयवर्गीय हे मध्य प्रदेशच्या इदौर मतदारसंघाचे आमदार आहेत. राफेल लढाऊ विमान करार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर बुधवारी (६ मार्च) झालेल्या सुनावणीत महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात राफेलची गोपनीय कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर भाजपसह पंतप्रधान मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करण्याची त्याचप्रमाणे त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांच्या या मागणीनंतर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्या मुलाने राहुल गांधींवर टीका केली आहे. “राहुल गांधींना पूर्वी पप्पू म्हटले जात होते. मात्र, तेव्हा ते निरुपद्रवी होते. आता ते देशविरोधी असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आता त्यांचे पप्पू हे नाव बदलले असून आता त्यांना ‘गधों का सरताज’ म्हणून ओळखले जाणार आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य आकाश विजयवर्गीय यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

CDS बिपीन रावत यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दाखल, अमित शहांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, तिघांचा मृत्यू

News Desk
देश / विदेश

जम्मूमधील बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

News Desk

नवी दिल्ली | जम्मूमधील एका बस स्टँडवर आज (७ मार्च) ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात १५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यातील जखमींना तातडीने जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाकडून या संपूर्ण परिसराला घेरण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरवाढीला ब्रेक; देशात मात्र…

News Desk

गुजरातच्या सचिवालय परिसरात बिबट्या शिरला

News Desk

इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे १६८ जणांचा मृत्यू

News Desk