HW News Marathi
Covid-19

लग्न समारंभ व अंत्यसंस्कारमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे । आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली। लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक नागरिकांच्या एकत्र येण्यावर मनाई आहे. लग्न समारंभातही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे. अंत्यसंस्कारावेळीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. अंत्यविधीला २० पेक्षा अधिक नागरिक सहभागी होऊ शकत नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (५ मे) सांगितले.

देशात गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ३,९०० नवे रुग्ण सापडले असून, १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरात आतापर्यंत ४६ हजार, ४३३ कोरोना रुग्णांची संख्या आहे. तक१, ०२० जण कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १ हजार ५५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू होण्याचे हे सर्वाधिक प्रमाण आहे, असे त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.खासगी ऑफिसेस किंवा संस्थांच्या कार्यालयांमध्ये थर्मल स्कॅनिंग, मास्क, हॅण्डवॉश आणि सॅनिटायजर आवश्यक आहे. कार्यालयांमध्ये आणि कंपन्यांच्या बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करणे आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याच्या महापौरांनी हॉटस्पॉट परिसराचा घेतला आढावा

News Desk

‘उद्धवजी, देर आये दुरुस्त आये!’भाजप आमदाराची टिका ..

News Desk

इंदोरीकर महाराजांचा निलेश लंकेंना पाठिंबा, ऑडियो क्लिप व्हायरल

News Desk