HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत जवानांकडून २ दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर | सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज (३ जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. शोपियानमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने त्यांनी शोधमोहीम सुरू आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियान जिल्ह्यातील मोलू चित्रगम परिसरात आज चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

गेल्या पाच महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी सुरु आहेत. सैन्याकडून काश्मीर प्रातांत सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत. यादरम्यान जवानांनी १०३ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले आहे. परंतु या चकमकींमध्ये आपले ६२ जवान शहीद झाले आहेत. २०१८ या संपूर्ण वर्षात जवानांनी २५७ दहशतवाद्यांना कंटस्नान घालण्यात जवानांना यश आले असून यादरम्यान ९१ जवान शहीद झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीच्या चांदनी महल भागातील १३ मशिदीमध्ये राहणाऱ्या १०२ जणांपैकी ५२ कोरोना पॉझिटिव्ही

News Desk

शंभर वर्षांनतर पूर्ण सूर्यग्रहण पाहण्याची संधी, अमेरिकेने जाहीर केली सुटी

News Desk

राष्ट्रवादीला का हवाय पियुष गोयल आणि रविशंकर प्रसाद यांचा राजिनामा 

News Desk