HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | गेल्या तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास अखेर भारतीय सैन्याला यश आले आहे. सुरक्षा दलाला या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानांनी या संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरु केली. दिवसेंदिवस सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढतच आहेत. भारतीय सैन्याकडून मात्र पाकिस्तानला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

भारतीय सैन्याकडून मात्र पाकिस्तानला या कुरघोड्यांना वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, या चकमकीत ५ भारतीय जवान शहीद झाले असून ९ जवान जखमी झाले आहेत. या ९ जखमी जवानांपैकी २ जवान सीआरपीएफचे असून ७ जवान लष्कराचे आहेत. तसेच या चकमकीत सीआरपीएफचे २ तर जम्मू-काश्मीर पोलीस दलातील २ कर्मचारी शहीद झाले आहेत.पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर इतका आंतरराष्ट्रीय दबाव असताना देखील एकीकडे शांततेची भाषा करणारा पाकिस्तान दुसरीकडे सीमारेषेवर मात्र दर दिवशी कुरापती करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रगीताचा अवमान कराल तर ३ वर्ष शिक्षा  

News Desk

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल

News Desk

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात एका दहशतवाद्याचा खात्मा

swarit