HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसमुळे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याची गरज पडली !

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २९३ खासदारांनी मतदान केले तर ८२ विरोधात मते पडली. राज्यातील अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पादवरून भाजप-शिवसेनेची युती तुटली असून आज (९ डिसेंबर) सामनाच्या संपादकीयमधून या विधेयकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर तोफ डागली होती. मात्र, सभागृहात विधेयक मांडल्यानंतर शिवसेनेने विधेयकाच्या बाजुने मत केले आहे. “काँग्रेसमुळे हे विधेयक मांडण्याची गरज पडली, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केला आहे. शहा पुढे म्हणाले की, “धर्माच्या आधारे काँग्रेसने देशाचे विभाजन केले. काँग्रेसने तसे केले नसते तर हे दुरुस्ती विधेयक आणण्याची गरज भासली नसती,” असे म्हणत शहांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

जनतेने लोकसभा निवडणुकीत बुहमताने निवडून दिले आहे. त्यामुळे तुम्हाला पाच वर्षे आमचे ऐकावेच लागेल, असे शहा सांगत शहा यांनी विरोधकांचा विरोध हाणून पाडला. हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात ०.००१ टक्के पण नाही. त्यामुळे विरोधकांनी ‘वॉकआऊट’ करू नये, असे आव्हान देखील शहांनी केले आहे.

मी संपूर्ण देशाला आश्वासन देतो की, हे विधेयक संविधानाच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन करीत नाही. सर्वांनी कलम १४ चा उल्लेख केला. हे कलम कायदा बनवण्याला रोखू शकत नाही. नागरिकतेवर पहिल्यांदा निर्णय होत नाही. १९७१ साली इंदिरा गांधी यांनी म्हटले होते. बांगलादेशहून आलेल्या लोकांना नागरिकत्व दिले जाईल. काँग्रेस शासन काळात युगांडाहून आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्यात आले आहे, अशा शब्दांत अमित शहा यांनी काँग्रेससह विरोधकांवर हल्ला चढवला.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील धार्मिक छळाला कंटाळून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही. तसेच त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व दुरूस्ती विधेयकात आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्ट टॉयलेट पेपर सर्च करताच पाकिस्तानचा झेंडा, गुगल म्हणते आमचा दोष नाही

News Desk

राज्यघटनेत आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्याची तरतूद नाही !

News Desk

अन् खडसे फडणवीसांना म्हणाले, “आता जेवल्याशिवाय जाऊ नका…”

News Desk