HW News Marathi
Covid-19

“पापड खाल्ल्याने कोरोना बरा होतो” असा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. शनिवारी (८ ऑगस्ट) मेघवाल यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कधी एकदा कोरोनावरील लस येते याची प्रतीक्षा संपूर्ण जगाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कोरोनावरील औषध आणि उपायांचे विविध दावे कोणा ना कोणाकडून सतत केले जातात. विशेष म्हणजे अर्जुन मेघवाल यांनी देखील असाच एक अजब दावा केला होता. “पापड खाल्ल्याने कोरोना बरा होतो”, असा दावा अर्जुन मेघवाल यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका देखील झाली होती.

केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांच्या हस्ते काहीच दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीचा पापड लाँच करण्यात आला होता. या कार्यक्रमात अर्जुन मेघवाल यांनी थेट असा दावा केला की, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, या विषाणूचा सामना करण्यासाठी या पापडाने तुमच्या शरीरात आवश्यक त्या अँटीबॉडीज तयार होतील. ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत एका खाजगी कंपनीने ‘भाभीजी पापड’ नावाचे हे उत्पादन बाजारात आणले आहे. हे पापड खाल्ल्याने तुमच्या शरीरात कोरोनाशी सामना करण्यासाठी आवश्यक त्या अँटीबॉडीज तयार होतील. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. ते ह्यात यशस्वी होतील अशी मला आशा आहे”, असे अर्जुन मेघवाल म्हणाले. दरम्यान, मेघवाल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांपासून-खडसेंपर्यंत भाजपच्या नेत्यांचे राज्य सरकारविरोधात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

News Desk

राज्याची चिंता अधिकच वाढली ! आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांजवळ

News Desk

राज्यात कोरोनाचा आकडा २१५, तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याचं सरकारसमोर संकट !

Arati More