HW News Marathi
देश / विदेश

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री जाणार, पंतप्रधानांचा निर्णय

नवी दिल्ली | रशिया-युक्रेनमध्ये गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थी तेथे अडकलेले आहेत.  या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी भारतीय सरकारने मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमे विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील चार मंत्री युक्रेन लगतच्या देशात जाणार आहेत. यासंदर्भात मोदींनी आज (२८ फेब्रुवारी) एक उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत केंद्रातील चार मंत्री जाणार असल्याचे निश्चित झाले आहेत. 

दरम्यान, यात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे चार मंत्री युक्रेन लगतच्या देशात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे चारही मंत्री लवकरच रवाना होणार आहे.  सध्या युक्रेनमधून २४९ भारतीयांना घेऊन येणारे विमान पाचवे विमान दिल्लीत दाखल झाले आहेत. हे विमान काल (२७ फेब्रुवारी) रात्री रोमानियाहून दिल्लीत दाखल झाले होते. यासंदर्भाची माहिती परराष्ट्र मंत्री मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

रशियाने केलेल्या हल्यात आतापर्यंत  ४,५००  युक्रेनचे सैनिकांचा मृत्यू झाले आहेत. तर युक्रेनचे १५० रणगाडे, ६० फ्युएल टॅक आणि २७ विमाने नष्ट करण्यात आली आहेत, ही माहिती युक्रेनच्या मंत्रालयाकडून दिली आहेत. युक्रेनमधील बुखारेस्ट, रोमानिया आणि बुडापेस्ट, हंगेरी येथून काल (२७ फेब्रुवारी) आतापर्यंत  ६८८ भारतीयांना मादेशात पतर आणले आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे म्युझियम “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे ओळखले जाणार

News Desk

#CoronaVirus : प्रिय पंतप्रधानजी, सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर !

swarit

पंतप्रधानांसोबतची बैठक सकारात्मक झाली, मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती

News Desk