HW News Marathi
देश / विदेश

भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची वेळ, ममता बॅनर्जींचं सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्रं

कोलकाता | देशात, राज्यात सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. या विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी सलग तिसरी निवडणूक जिंकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, जगन रेड्डी, के. एस. रेड्डी, फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांनी पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रातून विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी सुचवलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रात सात मुद्द्यांचा उल्लेख केला असून भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच देशातील जनतेसमोर आपण नवा पर्याय ठेवला पाहिजे असंही मत व्यक्त केलं आहे.

नुकताच दिल्लीत नवीन कायदा मंजूर करण्यात आला असून यामध्ये केंद्राचे प्रतिनिधी असणाऱ्या नायब राज्यपालांना लोकनियुक्त सरकारच्या तुलनेत जास्त अधिकार देण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी यांनी पत्रामध्ये याचा उल्लेख करत देशातील अशा सात घटनांचा उल्लेख केला आहे ज्याला त्यांनी भाजपाने लोकशाही आणि सहकारी संघराज्यवर केलेला हल्ला असं म्हटलं आहे. “भाजप इतर पक्षांना घटनात्मक हक्क आणि स्वातंत्र्य मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारांचे अधिकार सौम्य करून त्यांना केवळ पालिकेच्या स्तरावर न्यायचं आहे. थोडक्यात त्यांना संपूर्ण देशात एका पक्षाचं हुकूमशाही शासन स्थापन करायचं आहे,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

“मला वाटतं ती वेळ आली आहे जेव्हा भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. टीएमसीची प्रमुख म्हणून मी मनापासून तुमच्यासोबत आणि समविचारी इकर पक्षांसोबत या लढ्यात आहे,” असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.ममता बॅनर्जींनी हे पत्र सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच डीएमकेचे स्टॅलिन, वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी, बीजेडी प्रमुख नवीन पटनाईक, तेलंगण राष्ट्रसमिती प्रमुख चंद्रशेखर राव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पाठवलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भैय्यू महाराजांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

News Desk

पेट्रोलचे दर गगणाला भिडल्याने सर्वसामान्याचे खिशे रिकामे

swarit

शेपूट जोपर्यंत पूर्ण ठेचले जात नाही, तोपर्यंत ही ‘नापाक’ वळवळ सुरूच राहील !

News Desk