HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदारांना सभापती वैंकय्या नायडूंनी केले निलंबित 

नवी दिल्ली | राज्यसभेत काल (२० सप्टेंबर) गोंधळ घालून गैरवर्तन केल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या ८ खासदारांना राज्यसभा सभापती वैंकय्या नायडू यांनी निलंबित केले आहे. डेरेक ओ ब्रायन, संजय सिंह, राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेना, सय्यद नाजीर हुसैन, इलामारन करीम अशी निलंबित केलेल्या खासदारांची नावे आहेत. त्यांच्यावर एक आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.काही सदस्यांनी संसदीय शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी झाली, अशा शब्दांत राज्यसभा सभापती एम वैंकय्या नायडू यांनी खंत व्यक्त केली आहे.

कृषी क्षेत्राशी संबंधित दोन विधेयके काल राज्यसभेत मंजूर करण्यात आली होती. यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला पण आवाजी मताद्वारे दोन्ही विधेयकांना मंजुरी देण्यात आली. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. खासदारांनी नियमावलीचं पुस्तक फाडून ते उपसभातींच्या दिशेने भिरकावले होते. या गैरप्रकारामूळे या ८ खासदारांनि निलंबित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्लीसह ‘ही’ २ राज्य वगळून आज देशभर शेतकऱ्यांचा चक्काजाम

News Desk

शबरीमला प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

News Desk

16 व्या वर्षात 12 लाख पगार, शिक्षण फक्त 12 वी

News Desk