HW News Marathi
देश / विदेश

कोण आहे स्टीफन हॉकिंग

केंब्रिज | जेष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ वर्षी निधन झाले. त्यांनी केंब्रिज येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. हॉकिंग यांनी विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेला सिद्धात विज्ञानिक जगात महत्त्वापूर्ण मानला जातो. त्यांच्या जाण्याने विज्ञान जगाततील लोकांसाठीच नव्हे तर, संपूर्ण जगासाठी कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

इंग्लंड मधील ऑक्सफर्ड येथे स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधन होते, तर त्यांची आई ही इझोबल ऑक्सफर्डमधून पदवी घेतली. हॉकिंग यांना लाहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. हॉकिंग यांना सेंन्ट अल्बान्स स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे. त्यांना पहिल्यापासूनच विज्ञान विषयात रस होता. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठतून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला

८ जानेवारी १९६३ रोजी स्टीफन यांना एक रोग झाला. त्या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) आणि अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅपटर स्क्लोरोसिस (A. L. S) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील सर्व स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. हॉकिंन हे फक्त दोन वर्ष जगतील असे डॉक्टरांनी सांगितले होते. हे कळाल्यानंतर ते खूप निराश झाले होते. पण, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर इतर रूग्णांना आजाराशी लढताना पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी व्हील चेअरचा आधार घेऊन रोगावर मात केली.

‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम’ हा त्यांचा ग्रंथ जगभरात प्रचंड गाजला. येत्या १०० वर्षात पृथ्वी सोडून मानवाला दुसऱ्या ग्राहावर आसरा घ्यावा लागेल, असे भाकित स्टीफन हॉकिंग यांनी गेल्याच वर्षी केले होते. कारण पृथ्वी ही मानवी वास्तव्यास राहणार नसल्यामुळे मानव हे पाऊल उचलणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#PulwamaAttack : शहीद जवानांना राजनाथ सिंह यांनी खांदा देऊन वाहिली श्रद्धांजली

News Desk

एलआयसीची आयडीबीआय बँकेला मदत,गुंतवणार १२ हजार कोटी

News Desk

पंकजा मुंडे यांचे भोपाळ विमानतळावर जंगी स्वागत

News Desk
मुंबई

लक्ष्यवेधचा ३६ वा “लक्षसिध्दी सोहळा” दिमाखात संपन्न

News Desk

मुंबई | लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स या संस्थेने ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याचे आयोजन केले होते. नुकताच हा लक्षवेध चा “लक्षसिध्दी सोहळा” मैसुर असोसिएशन सभागृह माटुंगा येथे पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनएसडीएल (NSDL) या संस्थेचे उपाध्यक्ष मनोज साठे हे उपस्थित होते. या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये लक्षवेध संस्थेचे सर्वेसर्वा अतुल राजोळी यांनी मनोज साठे यांच्या सोबत “समृद्धीचा राजमार्ग” ह्या विषयावरील चर्चासत्र घेतले. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या मनातील प्रश्न त्यांना विचारले.

“आयुष्यात तुम्ही किती पैसे कमावता ही गोष्ट महत्वाची नसते. समृद्धीचा राजमार्ग जर तुम्हाला मिळवायचा असेल तर “वा, वा, वा, वा” या तत्वाला आत्मसात करा. ह्या तत्वामधील पहिला ‘वा’ म्हणजे तुम्ही कमवलेले पैसे वाचवायला शिका, दुसरा ‘वा’ म्हणजे वाढ तुम्ही कमवलेले पैसे काही प्रमाणात गुंतवा जेणे करून त्यामध्ये वाढ होईल. तिसरा ‘वा’ म्हणजे पैश्यांचा वापर करा जेणे करून अर्थव्यवस्था प्रवाहात राहील आणि चौथा शेवटचा ‘वा’ म्हणजे पैसे वाटायला शिका तुमच्या कडील अधिक पैसे गरजू व्यक्तींमध्ये किंवा सामाजिक कार्यासाठी त्याचा वापर करा . हे तत्व तुम्ही पाळलेत तर यश नक्कीच तुमचे होईल’’ असे बहुमूल्य मार्गदर्शन मनोज साठे यांनी ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये उद्योजकांना केले.

व्यावसायिकांना दिग्गज वक्त्यांकडून मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची व्यावसायिक वृद्धी व्हावी म्हणूनलक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स असे परिसंवाद घेत राहील असे लक्षवेध चे संस्थापक अतुल राजोळी यांनी सांगितले. ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

 

Related posts

बाप्पाच्या दर्शनापासून भाविक पाच दिवस वंचित

News Desk

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk

पती पत्नीसह नऊ जणांना अटक, घरगुती वादात केली कारवाई

News Desk