HW News Marathi
देश / विदेश

जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन

जपान | जगातील सर्वात वृद्ध महिला असलेल्या नबी ताजीमा यांचे शनिवारी रात्री ८ च्या दरम्यान निधन झाले. दक्षिण जपान मध्ये रहाणा-या नबी ताजीमा मृत्यू समयी ११७ वर्षांच्या होत्या. ताजीमा यांनी किकाईजिमा च्या एका रुग्णालयात शनिवारी शेवटचा श्वास घेतला. किकाई मधील एका अधिका-याने दिलेल्या माहिती नुसार शनिवारी ८ च्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्या जानेवारी २०१८ पासून रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्या तब्बल ११७ वर्षे २८० दिवस जगल्या. त्यांच्या दिर्घाआयुष्याचे रहस्य सांगताना स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पूर्णवेळ झोप हे कारण असल्याचे त्या सर्वांना सांगत असत.

ताजीमा यांच्या जन्म ४ ऑगस्ट १९०० मध्ये झाला होता. त्यामुळे त्या जगातल्या अनेक घडामोडींच्या साक्षिदार होत्या. त्याच बरोबर तंत्रज्ञात होत गेलेली क्रांती देखील त्यांनी अनुभवली. ताजीमा जेव्हा ४५ वर्षांच्या होत्या तेव्हा जपान मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. प्रसिद्धी माध्यमांच्या माहीतीनुसार ताजीमा यांना 9 मुले होती. सध्या त्यांचे १६० पेक्षा जास्त वंशज आहेत. सात महिन्यापूर्वी वायलेट ब्राउन यांचे जमैका मध्ये निधन झाल्यानंतर ताजीमा यांना जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून घोषित करण्यात आले होते. वायलेट यांचे निधन देखील वयाच्या ११७ व्या वर्षी झाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्राच्या सूचनेनंतर युट्युबने कमांडर अभिनंदन यांचे आक्षेपार्ह व्हिडीओज हटविले

News Desk

सोनिया गांधी यांची रुग्णालयातून सुटका

News Desk

शरद पवारांनी मोदींच्या विरुद्ध नाही तर श्रीरामांच्या विरोधात विधान केले – उमा भारती

News Desk
महाराष्ट्र

दुधाचे दर वाढण्याची शक्यता

News Desk

पुणे | दुधाच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे दुध उत्पादकांनी आंदोलन केल्यानंतर उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, ५० दिवस उलटूनही प्रत्यक्ष ती रक्कम न दिल्याने या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे. त्यामुळे दुधाचे दर एका लिटरमागे पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

अनुदान थकल्यामुळे उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक गुरुवारी झाली. त्यात ५८ सहकारी आणि खासगी डेअरीचे ७६ प्रतिनिधी उपस्थित होते. उत्पादकांना दर कमी मिळत असल्याने अनुदान देण्याचा निर्णय जुलैमध्ये राज्य सरकारने घेतला होता. आॅगस्ट महिन्याची रक्कम उत्पादकांना दिली. मात्र, त्यानंतर आतापर्यंतची रक्कम मिळालेली नाही. सरकारने १५ डिसेंबरपर्यंत अनुदान न दिल्यास त्या योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिला. त्यामुळे दुधाचे दर वाढविणार की नाही यावर बोलण्यास नकार दिला. मात्र मात्र अनुदान योजनेतून बाहेर पडल्यास दुधाचा दर वाढविण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय नसल्याचे सांगण्यात येते.

राज्यात गायीच्या दुधाचे दर १७ ते २० रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले होते. ग्राहकाला मात्र ते ४० ते ४२ रुपये प्रतिलिटरनेच दूध मिळत होते. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेसह विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी १६ जुलैला दूधबंद आंदोलन केले होते. गाड्या अडवून दूध रस्त्यावर ओतणे, दुधाने जनावरांना आंघोळ घालणे, दुधाचे मोफत वाटप करणे, दुग्धाभिषेक करणे अशा विविध मार्गाने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने दुध उत्पादकांना योग्य ते भाव दिले जातील असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन १९ जुलैला आंदोलन करण्यात आले. त्यात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उत्पादकांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ आणि म्हशीला ३६ रुपये देण्याचे ठरले आहे.

Related posts

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता शरद पवारांच्या दरबारी जाणार

News Desk

मुंबईत रिक्षा, टॅक्सीचे भाड ३ रुपयांनी वाढले!

News Desk

भारनियमनाविरोधात राष्ट्रवादीचा‘कंदील मेणबत्ती’ मोर्चा

News Desk