HW News Marathi
देश / विदेश

जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन

जपान | जगातील सर्वात वृद्ध महिला असलेल्या नबी ताजीमा यांचे शनिवारी रात्री ८ च्या दरम्यान निधन झाले. दक्षिण जपान मध्ये रहाणा-या नबी ताजीमा मृत्यू समयी ११७ वर्षांच्या होत्या. ताजीमा यांनी किकाईजिमा च्या एका रुग्णालयात शनिवारी शेवटचा श्वास घेतला. किकाई मधील एका अधिका-याने दिलेल्या माहिती नुसार शनिवारी ८ च्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्या जानेवारी २०१८ पासून रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्या तब्बल ११७ वर्षे २८० दिवस जगल्या. त्यांच्या दिर्घाआयुष्याचे रहस्य सांगताना स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पूर्णवेळ झोप हे कारण असल्याचे त्या सर्वांना सांगत असत.

ताजीमा यांच्या जन्म ४ ऑगस्ट १९०० मध्ये झाला होता. त्यामुळे त्या जगातल्या अनेक घडामोडींच्या साक्षिदार होत्या. त्याच बरोबर तंत्रज्ञात होत गेलेली क्रांती देखील त्यांनी अनुभवली. ताजीमा जेव्हा ४५ वर्षांच्या होत्या तेव्हा जपान मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. प्रसिद्धी माध्यमांच्या माहीतीनुसार ताजीमा यांना 9 मुले होती. सध्या त्यांचे १६० पेक्षा जास्त वंशज आहेत. सात महिन्यापूर्वी वायलेट ब्राउन यांचे जमैका मध्ये निधन झाल्यानंतर ताजीमा यांना जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून घोषित करण्यात आले होते. वायलेट यांचे निधन देखील वयाच्या ११७ व्या वर्षी झाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत एकट्या ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ५३४ कोरोनाबाधित, ‘ही’ आहे वॉर्डनिहाय आकडेवारी

News Desk

मला निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे !

News Desk

जाणून घ्या…’या’ कर्तृत्वान महिलेने पंतप्रधान मोदींच्या अकाउंटवरून केले पहिले ट्वीट

swarit
महाराष्ट्र

गडचिरोली | पोलिसांच्या कारवाईत १६ नक्षलवादी ठार

News Desk

गडचिरोली | जिल्ह्यातील भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील तब्बल १६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईत नक्षवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य व जहाल कमांडर साईनाथ ऊर्फ डोलेश मडी आत्राम (३५) व श्रीणू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रोवूथ विजेंद्र नरसिंहा रामडू (३८) या दोघांना मारण्यात पोलिसाना आले.

या पोलीस कारवाईत पेरीमिली दलमचे बहुतांश सदस्य ठार झाले आहेत. गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने शनिवारी रात्रीपासून शोधमोहीम सुरू केली होती. रविवारी नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी चारही बाजूने घेराव करुन १६ नक्षलवाद्यांना ठार केले. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा ही समावेश असून त्यांना ठार करण्यात आले.

Related posts

सुप्रिया सुळेंनी दिल्या भाजप-मनसे युतीसाठी शुभेच्छा !

News Desk

नितेश राणेंनी BMC आयुक्तांना पत्र लिहून गिरगाव व्ह्यूइंग डेकची पुन्हा एकदा मागितली माहिती

Aprna

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर – नवाब मलिक

News Desk