HW News Marathi
देश / विदेश

नापासांची चालढकल अखेर रद्द

नवी दिल्ली तुम्ही आठवडीपर्यंत डोळेझाकून पास होण्याची सरकारने व्यवस्था केलेली आहे. आता ही सोय थांबवण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गांभीर्याने अभ्यास करावा लागणार आहे, तसेच शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.

केंद्र सरकारने आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण संपुष्टात आणण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर देशात २० संस्थांच्या निर्मितीसाठीही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यातून बाल निशुल्क,अनिवार्य शिक्षण अधिकार संशोधन विधेयकात एक तरतूद केली जाईल. त्यामुळे राज्यांना वर्ष अखेरीस होणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांना पुढील वर्षांत प्रवेश मिळणार नाही.

परंतु, या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पुढील वर्गात प्रवेश मिळण्याची आणखी एक संधी दिली जाईल. आता हे विधेयक मंजुरीसाठी संसदेत सादर केले जाणार आहे. शिक्षण अधिकार अधिनियमांतर्गत केलेल्या तरतुदीनुसार विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण न होता ही आठवीपर्यंत जाऊ शकतो. हा नियम एप्रिल २०११ मध्ये लागू करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय

News Desk

रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावित व्यवस्थापन मंडळास सहकारी बँकांच्या संघटनांचा तीव्र विरोध

Gauri Tilekar

मोदींच्या मंत्रीमंडळात बिगरभाजपचे उरले एकचं मंत्री ! रामदास आठवले …

News Desk
देश / विदेश

अहमदाबादेत मुस्लिमांनी केली मंदिराची स्वच्छता

News Desk

अहमदाबाद गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर तिथे अनोखा बंधुभाव पाहायला मिळत आहे. बनासकांठातील धानेरामध्ये मुस्लिम बांधवांनी येथील मंदिरांमध्ये साचलेला चिखल स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानाचे फोटो वेगाने सोशल मीडियात व्हायरल होतआहेत.

धानेरामध्ये सिद्धिविनायक गणपती आणि सतीमाता मंदिर असून या मंदिरांमध्ये जवळपास ८ ते १० फूट पुराचे पाणी भरले होते. हे पाणी ओसरल्यानंतरमंदिरात चिखलाचा थरच लागला होता. १५ ते २० मुस्लिम बांधवांनी हा सगळा चिखल बाहेर काढून मंदिर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. जमिया उलेमा ए हिंदचे हेकार्यकर्ते पालमपूर येथून आले होते. पुराचा तडाखा बसलेल्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले होते. मी एकटाच सफाई करत असल्याचे पाहून त्यांनीमदतीचा हात पुढे केला. सुमारे दोन तास श्रमदान करून त्यांनी पूर्ण मंदिर स्वच्छ केलं. गणपती मंदिरानंतर त्यांनी जवळच असलेल्या सतीमाता मंदिरातही साफसफाईकेली असे, येथील पुजऱ्याने सांगितले.

Related posts

#AyodhyaJudgment : वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा

News Desk

#PulwamaAttack : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर

News Desk

किम जोंग उन यांनी सेनाधिकाऱ्यावर ९० गोळ्या झाडल्या

News Desk