HW News Marathi
देश / विदेश

मायावतींची राजकीय कारकीर्द धोक्यात ?

विधानसभा पोटनिवडणूकाचा एकमेव पर्याय

मुंबई – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांची राजकीय कारकीर्दच धोक्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपला अवघ्या १९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. २ एप्रिल २०१८ रोजी मायावती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. पण राज्यसभेत राजण्यासाठी किमान ३७ आमदार असणे आवश्यक आहे. परंतू मायावती यांच्याकडे केवळ १९ आमदार असल्याने त्यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मागच्या दाराने जाण्यासाठी त्या प्रयत्न करू शकतात. पण विधान परिषदेसाठी २९ आमदारांची गरज लागते. मायावतींकडे तेवढे संख्याबळ नसल्याने त्यांचा विधान परिषदेतही जाता येणार नाही. एखाद्या आमदाराला राजीनामा द्यायला सांगून पोटनिवडणुकीला सामोरे जाणे हाच मायावतींसमोरचा एकमेव पर्याय असणार आहे. तसे न केल्यास मायावतींची राजकीय कारकिर्द धोक्यात येण्याची शक्यता आहेत. मात्र, मायावतींनी आता कुठल्याही सभागृहाचे सदस्य न होता, पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करावे, असाही एक मतप्रवाह पक्षात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सर्वोच्च न्यायालयाकडून श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी उठविली

News Desk

हिमाचल प्रदेशात दरड कोसळली, ९ पर्यटकांचा मृत्यू

News Desk

सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल पदी नियुक्ती

swarit
मुंबई

फेरीवाल्यांना हटवा, राज यांचे आयुक्तांना निवेदन

News Desk

मुंबई: राज ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुकत्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्त्यांवरून फेरीवाल्यांना त्वरीत हटवण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी राज यांनी रेल्वे पूल आणि फुटपाथवरून चालणा-या लोकांच्या समस्याही त्यांच्यापुढे मांडल्या. या निवेदनात राज यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदभार्तील अनेक मुद्देही उपस्थित केले आहेत.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करावी. जेणेकरून तिन्ही यंत्रणांच्या समन्वयातून ठोस पावले उचलली जातील. मनसेच्या संताप मोचार्नंतर बहुतांश रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. मात्र, हे सगळे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकांना यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पालिकेने व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. फेरीवाले बसतात त्या परिसरात हे व्हॉटसअ‍ॅप क्रमांक असलेले फलक पालिकेने लावावेत. जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या परिसरात फेरीवाल्यांकडून होणाºया अतिक्रमणाचे फोटो पाठवता येतील.

Related posts

बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेची दिवाळी भेट

News Desk

तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

News Desk

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळले

News Desk