HW News Marathi
देश / विदेश

युद्धासाठी पुरेसा दारूगोळा कुठे आहे, कॅगच्या अहवालाने खळबळ

नवी दिल्लीः चीन आणि पाकिस्तानबरोबर भारताच्या संबंधात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. याच दरम्यान, भारताचे नियंत्रक- महालेखापरीक्षकांनी (कॅग) दिलेल्या अहवालाने मात्र सर्वांचीच झोप उडाली आहे. भारतीय लष्कराकडे अवघे १० दिवस पुरतील इतकाच दारूगोळा असल्याचा अहवाल कॅगने संसदेत सादर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सीमेवर तणाव सुरू असतानाच आलेला हा अहवाल भारतीयांच्या दृष्टीने चिंतेत टाकणारा विषय आहे.

लष्कराच्या मुख्यालयाने वर्ष २००९ ते २०१३ या कालावधीत सुरू केलेली खरेदी प्रक्रियेतील जानेवारी २०१७ पर्यंत प्रलंबित होती. वर्ष २०१३ पासून ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून पुरवण्यात येणाऱ्या दारूगोळाच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधण्यात आले. परंतु, यात विशेष काही सुधारणा झाली नाही. उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करण्यातही अपयश आले. नाकारण्यात आलेले किंवा आवश्यक नसलेला पण चांगला दारूगोळा हटवण्याचा किंवा तो दुरूस्त करण्याचाही प्रयत्न झाला नाही. दारूगोळा डेपोत अग्निशमन कर्मचाऱ्यांचीही कमतरता असून अपघातांचाही धोका राहिला, असे कॅगने संसदेत सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“…. तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू” – जीएसटी संदर्भात अजित पवारांचा इशारा

News Desk

Breaking News | दिल्लीमध्ये तीन मजली इमारत कोसळली

News Desk

भारताच्या प्रजासत्ताक दिनी ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो प्रमुख पाहूणे

swarit
देश / विदेश

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

वृत्तसंस्थाः सध्या एकापाठोपाठ एक करून देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला जात आहे. यामध्ये पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आहे. हे सर्व मिळून देशाला गुलामगिरीकडे ढकलत असल्याची जहरी टीका कॉँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथे केली. कर्नाटक सरकारकडून बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आपल्या राजा नागडा आहे, परंतु ते मान्य करण्याची कोणा अंध भक्ताची तयारी नाही, कारण भक्त त्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर जहरी टीका केली हे.

सध्या देशात खरं बोलणाऱ्यांता गळा दाबला जात असून गरीब व दुर्बल घटकांना नामोहरम केले जात आहे. भाजप हे बेगडी सरकार आहे. हुकुमशाहीकडे देशाला नेण्याची भाजप व संघाची चाल असून त्यानुसार सर्व खटाटोप सुरू असल्याचेही राहुल यांनी या वेळी म्हटले आहे.

Related posts

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार पडले

News Desk

दोन हजार रुपयांच्या नोटा गायब

News Desk

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ

News Desk