HW News Marathi
देश / विदेश

सचिन तेंडुलकर अखेर राज्यसभेत हजर

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): क्रिकेटमधील विक्रमादित्य, भारतरत्न सचिन तेंडुलकरने गुरुवारी राज्यसभेत हजेरी लावली. प्रश्नोत्तरांच्या तासात तो काही बोलला नाही, पण त्याच्या उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. सचिन आणि अभिनेत्री रेखा केवळ नावापुरते राज्यसभा सदस्य असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी पुढे आली होती.

समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी मंगळवारीच सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांना लक्ष्य केलं होतं. या दोघांच्या राज्यसभेतील अनुपस्थितीकडे लक्ष वेधत, विजय मल्ल्याप्रमाणे दोघांनाही निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आज लगेचच सचिनने राज्यसभा गाठली. सचिनप्रमाणेच बॉक्सिंग क्वीन मेरी कोमही संसदेत उपस्थित होती. २०१२ पासून सचिन तेंडुलकर राज्यसभेचा सदस्य आहे. तेव्हापासून ३४८ दिवसांच्या कामकाजापैकी तो फक्त २३ दिवस सभागृहात हजर राहिलाय, तर रेखा फक्त १८ दिवस राज्यसभेत दिसल्यात. त्यावरून त्यांच्यावर याआधीही बºयाचदा टीका झाली आहे, परंतु त्यानंतरही त्यांच्या दांड्या कमी झालेल्या नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसचा हात सपाची सायकल चालवू  शकणार नाही 

News Desk

‘चांद्रयान-२’ चे यशस्वी उड्डाण हा भारताच्या तिरंग्याचा सन्मान !

News Desk

चंद्राबाबू नायडू यांना भाजपने दिला मोठा धक्का

News Desk
देश / विदेश

अहमदाबादेत मुस्लिमांनी केली मंदिराची स्वच्छता

News Desk

अहमदाबाद गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर तिथे अनोखा बंधुभाव पाहायला मिळत आहे. बनासकांठातील धानेरामध्ये मुस्लिम बांधवांनी येथील मंदिरांमध्ये साचलेला चिखल स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानाचे फोटो वेगाने सोशल मीडियात व्हायरल होतआहेत.

धानेरामध्ये सिद्धिविनायक गणपती आणि सतीमाता मंदिर असून या मंदिरांमध्ये जवळपास ८ ते १० फूट पुराचे पाणी भरले होते. हे पाणी ओसरल्यानंतरमंदिरात चिखलाचा थरच लागला होता. १५ ते २० मुस्लिम बांधवांनी हा सगळा चिखल बाहेर काढून मंदिर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. जमिया उलेमा ए हिंदचे हेकार्यकर्ते पालमपूर येथून आले होते. पुराचा तडाखा बसलेल्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले होते. मी एकटाच सफाई करत असल्याचे पाहून त्यांनीमदतीचा हात पुढे केला. सुमारे दोन तास श्रमदान करून त्यांनी पूर्ण मंदिर स्वच्छ केलं. गणपती मंदिरानंतर त्यांनी जवळच असलेल्या सतीमाता मंदिरातही साफसफाईकेली असे, येथील पुजऱ्याने सांगितले.

Related posts

प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का ! पूर्वेश सरनाईकही ED च्या निशाण्यावर

News Desk

गुप्तेश्वर पांडेंनी सांगितले मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या भेटीचे कारण…

News Desk

‘ब्लॅक फंगस’चा कहर! साथीचा आजार म्हणून जाहीर, केंद्र सरकारच्या राज्यांना सुचना

News Desk