HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आदिशक्तीच्या आभूषणांना हिऱ्यांची सजावट

मुंबई | घटस्थापनेला आता अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. सध्या आकर्षक रंगसंगतीसह हिऱ्याची सजावट केलेल्या देवींच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. त्यामुळे देवीच्या मूर्तींना आभूषणे, अलंकार तसेच लखलखणाऱ्या आणि चमचमणाऱ्या हिऱ्यांनी मढविले जात आहे. नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील ठिकठिकाणच्या चित्रशाळेत गेल्या सहा महिन्यांपासून मूर्ती साकारण्याचे काम सुरू आहे.

भक्तांच्या मागणीनुसार, कोंबड्यावर आरूढ झालेली आई एकविरा, वाघावर बसून आलेली भवानी माता, अंबा माता, अष्टभुजा अंबामाता, तुळजाभवानी, शप्तशृंगी मातेच्या प्रतिकृतींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या मूर्तींना रंगकाम करण्याचे काम आटोपले आहे आणि मूर्तीला हिरे, रंगीबेरंगी खडे लावण्याचे काम जोरात सुरू आहे. मूर्तींमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. शिवाय, वेलवेट रंगाचा वापर करून मूर्ती अधिक उठावदार केली जाते. त्याचप्रमाणे देवीची आभूषणेही हिऱ्यांनी सजविली जात आहेत. अगदी देवीच्या गळ्यातील हार, कानातील झुमके, हातातील बांगड्या, पायातील पैंजणही हिऱ्यांनी, खड्यांनी सजविले जात आहेत.

दररोज नव रंगाची साडी

नवरात्री म्हटले की नव रंगाची साडी आणि नऊ रंग हे स्त्रियांच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. त्यामुळे या नऊ दिवसांत महिला त्या त्या रंगाच्या दिवशी त्या त्या रंगाच्या साड्या नेसतात. त्यावेळी देवीची त्याच रंगाच्या साडीने ओटी भरली जाते. मात्र मागच्या वर्षीपासून देवीलाही त्याच रंगाची साडी दररोज नेसविली जात आहे. यासाठी घरगुती मूर्तींमध्येही या वर्षी तीन फुटांच्या वर उंचीच्या मूर्तींची नोंदणी झाली आहे. उंच मूर्तींना दररोज त्याच रंगाची साडी नेसविता येत असल्याने अशा मूर्तींना पसंती दिली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नवोदित मंडळाची माऊली

News Desk

‘विक्रोळीच्या आई शिवाई’चे हे देखणे रूप

swarit

आजचा रंग केसरी, स्कंदमाता रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk
महाराष्ट्र

धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

News Desk

चंद्रपूर | तांदळाच्या नऊ जातीचा शोध लावणाऱ्या कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. खोब्रागडे हे गेल्या काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. चंद्रपुरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. खोब्रागडे यांना आज दुपारी त्यांच्या मूळ गावी नांदेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

खोब्रागडे यांच्याकडे मोजकीच जमीन होती. या जमिनीवर त्यांनी शेतीतील धानावर विविध प्रयोग केले. फक्त तिसरी शिकलेले खोब्रागडे यांनी एचएमटी या प्रसिद्ध अशा तांदळाचा शोध लावला. या तांदळाचा शोध लावून न थांबता. त्यांनी विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू या नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे.

  • दादाजी खोब्रागडे यांचा अल्प परिचय

दादाजी रामजी खोब्रागडे यांचे संपूर्ण नाव होते. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी होते. खोब्रागडे यांनी १९८५ ते १९९० या काळात त्यांनी धानाच्या नऊ नवीन वाणांचा शोध लावला. खोब्रागडे यांनी धान संशोधन क्षेत्रातील मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्य बदल फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते.

५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Related posts

केंद्र सरकारने जाचक रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल तरी बंद करावेत !-  नाना पटोले

News Desk

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडले, फडणवीसांची टीकास्त्र

Aprna

“वर्षभर ३ पक्ष एकत्र विटी दांडू खेळत होते का”, भाजपचा परखड सवाल

News Desk