HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis Press conference | देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ५ महत्वाचे मुद्दे..

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भाजपने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भाजपच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केलाशिवसेनेने सर्व पर्याय खुले असल्याच्या भूमिका सर्वात आधी घेतली. उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी एकदाही फोन घेतला नाही. शिवसेनेने आमच्याशी चर्चा करण्याऐवजी रोज काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केली. आमच्याशी चर्चा न करण्याचं धोरण चुकीचं आहे, अशी शिवसेनेनेबद्दल उघड नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. समज-गैरसमज चर्चेतून दूर होऊ शकतात. जितके घाव विरोधकांनी केले नाहीत, तितके घाव शिवसेनेनं केले आहेत, असंही त्यांनी म्हटलं.#DevendraFadnavis #BJP #Shivsena #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #SanjayRaut #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aditya Thackeray From Worli | वरळीकरांसाठी सुवर्णदिवस…आदित्य ठाकरेंबद्दल वरळीकरांना काय वाटतं ?

swarit

“जिथे जिथे ‘भारत जोडो’ यात्रा, तिथे तिथे ‘काँग्रेस छोडो’ यात्रा सुरु”, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

News Desk

प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्यांसाठी?, Omraje Nimbalkar यांचा सवाल

News Desk