HW News Marathi
व्हिडीओ

दुष्काळ पडलाय ?मग पाहुण्यांकडे जनावरे सोडा !

संपुर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळलेला असताना, फडणवीस सरकार मधले मंत्री मात्र शेतकऱ्याची क्रुर थट्टा करत आहेत. महाराष्ट्रात दुष्काळाची समस्या गंभीर बनत चालली आहे. पण भाजप सरकार शेतकऱ्यांना कोणतीही मदत करायला तयार नाही. त्यातच महाराष्ट्राच्या काहीच भागात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळच्या यादीमध्ये आपल्याही गावाचा समावेश करावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. पण महाराष्ट्रातील हे निर्दयी आणि असंवेदनशील सरकार शेतकऱ्यांचीच थट्टा करत आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, या तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काही लोक पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे निवेदन घेवून गेले असता, शेतकऱ्यांना मदत करायची सोडुन त्यांनी दुष्काळ पडलाय तर बघत काय बसलाय, जनावरे पाहुण्यांकडे सोडा, असा अजब सल्ला दिला ! राम शिंदे यांच्या या असंवेदनशील वक्तव्याबद्दल संपूर्ण नगर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजपाच्या ह्या असंवेदनशील सरकार बद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहेच. पण येणाऱ्या निवडणुकीत शेतकरीच भाजपा सरकारची मस्ती उतरवणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहा राम कदमांच्या वक्तव्यावर तरुणाईला काय वाटते…

swarit

Girish Mahajan BJP | गिरीश महाजनांचं हसतं हसतं, ‘सेल्फी पूरपर्यटन’

Arati More

मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा मोठा खुलासा

Seema Adhe