HW News Marathi
व्हिडीओ

Aurangabad विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करा!; Subash Desai यांची मागणी

यावेळी झालेल्या चर्चेत श्री. देसाई यांनी सांगितले की, मराठवाडयात अजिंठा -वेरुळ लेण्यांसह विविध पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना जपान, कोरिया,अमेरिका आदि देशांतून व वेगवेगळया राज्यांतून तसेच महाराष्ट्रातून मोठया संख्येने पर्यटक भेटी देतात. पर्यटक व प्रवशांचा वाढता ओघ पाहता औरंगाबाद विमानतळाची सद्याची धावपट्टी लहान पडत असून या धावपट्टीच्या विस्ताराची गरज असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी अधोरेखित केले. या कामी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक जमीन अधिग्रहण करण्यात येईल तसेच पुढील प्रक्रियेसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा विषय गतीने पुढे न्यावा व औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावे, अशी विनंतीही श्री. देसाई यांनी केली. राज्यशासनाने जमीन अधिग्रहण करून दिल्यास विमानतळ धावपट्टीचा विषय तत्परतेने पुढे घेवून जावू,असे आश्वासन यावेळी श्री. सिंधिया यांनी दिले.

#SubashDesai #JyotiradityaScindia #Aurangabad #Airport #CivilAviation #NarendraModi #UddhavThackeray #SharadPawar #SambhajiMaharaj #AdityaThackeray #ImtiyazZalel #BJP #NCP 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

BJP च्या Jaykumar Gore यांच्या विधानाने खळबळ, Video झाला व्हायरल…

News Desk

मविआने २०१९ मध्ये मला संपवण्याचा प्रयत्न केला – देवेंद्र फडणवीस

News Desk

सरकार कुठे आहे ? आमदार शिंदेंचा सवाल

News Desk