HW News Marathi
व्हिडीओ

Prithviraj Chavan , Devendra fadnavis | नागपूरला पूरस्थिती असती, तर फक्त भाषण दिली असती का ?

राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील पूरपरिस्थिती मुळे राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र विरोधक राज्यसरकारवर टीका करताना दिसत आहे.जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सांगली आणि कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती नागपूरला घडली असती, तर मंत्री भाषणं देत फिरले असते का? असा खोचक सवाल चव्हाणांनी फडणवीसांना विचारला आहे. तसेच पुढे बोलताना ‘फडणवीस सरकारचा पश्चिम महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन आकसाचा आहे. त्यामुळेच महापुराकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले.’ असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तेथे काही लक्ष द्यायची गरज नाही, हे बरोबर नाही. त्यामुळे सरकारने थोडं गांभीर्याने पाहायला हवं, असंही चव्हाण यांनी नमूद केलं. #PrithvirajChavan #DevendraFadnavis #Congress #MaharashtraFloods

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर देऊ! – Amol Mitkari यांचा इशारा

News Desk

“बेशरम लोकांनी #LataMangeshkar दीदींनाही सोडलं नाही”; Sanjay Raut यांची घणाघाती टीका

News Desk

EVM, Dhananjay Shinde | मुंबईत १२ जूनला ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय परिषद

News Desk