HW News Marathi
व्हिडीओ

…म्हणून बिहारमध्ये भाजप करणार कोरोनाच्या लसीचे मोफत वाटप, काय आहे प्रकरण !

संपूर्ण जगभरात गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला असताना कधी एकदा कोरोनावरची लस येते आणि आपण या विळख्यातून बाहेर पडतो असं प्रत्येकाला झालंय. सर्वच जण सध्या या लसीच्या प्रतीक्षेत आहेत. भारतातही जानेवारी २०२१ पर्यंत लस येईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र, एकीकडे कोरोनासारख्या विषाणूशी लढा सुरु असताना दुसरीकडे त्यावरूनही राजकारण होणं थांबलेलं नाही. ते कसं ? तर भारतात सध्या बिहार विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. संपूर्ण देशाचं या निवडणुकांकडे लक्ष आहे. मात्र, या निवडणुकांसाठी NDA कडून देण्यात आलेलं वचन सध्या चांगलंच चर्चेत आहे.

भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या कि, “कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत मास्क वापरणे गरजेचे आहे. ही लस उपलब्ध झाल्यावर तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल. तर बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. हे आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन आहे.” निव्वळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे वचन देत भाजपने थेट लोकांच्या वर्मावर बोट ठेवले आहे.

#NitishKumar #NarendraModi #BiharNDA #BiharElections #BiharBJP #JDU #NirmalaSitharaman #JPNadda

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी‘स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

News Desk

MahavikasAaghadi Karjmafi | सरकारने केलेल्या कर्जमाफीचे शेतकऱ्यांनी पेढे वाटून केले स्वागत..

Arati More

Mamata Banerjee यांच्या मुंबई दौऱ्याचे अर्थ काय? Sharad Pawar यांची साथ मिळणार?

News Desk