HW News Marathi
राजकारण

आज संध्याकाळी जाहीर होणार नव्या १३ मंत्र्यांची खाती

मुंबई | बहुप्रतीक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज (१६ जून) पार पडला आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी या १३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली असून आज संध्याकाळी या सर्व मंत्र्यांची खाती जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात आज नव्याने सामील झालेल्या १३ मंत्र्यांची खाती जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचप्रमाणे सोमवारपासून (१७ जून) सुरू होत असलेल्या राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण २८ विधेयकांवर चर्चा होणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘हे’ आहेत नवे कॅबिनेट मंत्री

  • राधाकृष्ण विखे पाटील
  • आशिष शेलार
  • जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
  • तानाजी सावंत (शिवसेना)
  • संजय कुटे
  • सुरेश खाडे
  • डॉ. अनिल बोंडे
  • डॉ. अशोक उईके

हे’ आहेत नवे राज्यमंत्री

  • योगेश सागर
  • अतुल सावे
  • संजय उर्फ बाळा भेगडे
  • परिणय फुके
  • अविनाश महातेकर
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर प्रचारबंदी लागू केली !

News Desk

राम शिंदे-विखे पाटलांच्या वादावर भाजपची बैठक

News Desk

RamMandir : महाराष्ट्र ते अयोध्या रामसेतू | सामना

News Desk