HW News Marathi
राजकारण

समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

मुंबई | २०१९ ला होणा-या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष सध्या नव्याने पक्षबांधणी करत असल्याचे पहायला मिळत आहे. आगामी निवडणुकींचा विचार करुन समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांतील नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या वतीने खासदार अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी तर भाकपच्या वतीने तुकाराम भस्मे उपस्थित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#Vidhansabha2019 |अखेर शिवसेनेकडून रश्मी बागल यांना एबी फॉर्म

News Desk

पूनम महाजन यांनी थेट ‘मातोश्री’ गाठले, युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

News Desk

…आणि पवारांचा माणूस शिवसेनेचा मंत्री झाला !

News Desk
मनोरंजन

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर सावधान !

News Desk

मुंबई । महाराष्ट्रात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. गणेश भक्त लालबागच्य२ राजाच्या दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारणची चांगलीच चंगळ झाली आहे. लालबाग परिसरात अन्य ठिकठिकाणी गणपती बाप्पा मंडळात विराजमान होऊन चार दिवस उलटले आहे. परंतु याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे गणेश भक्तांच्या पाकीटावर हात सफाई करत होते.

तसेच लालबाग परिसरातील काळाचौकी पोलीस ठाण्यात गेल्या चार दिवसांपासून जवळपास १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारीची नोंद करण्यात आली. मोबाईलच्या तक्रारी नोंदवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. मोबाईल चोरीच्या सर्वात जास्त तक्रारी या लालबागचा राजा परिसरात घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील गणेशोत्सवात लालबाग आणि परळ भागातून गणपती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. या गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमे-यांची सोय केली असून यांच्या आधारे या पाकीट मारांचा पोलीस शोध घेत आहेत. गतवर्षी देखील गणेशोत्सवाच्या काळात पाकीट मार भुरट्या चोरींचा सुळसुळाट होता. तेव्हा पोलिसांनी दोन चो-यांच्या टोळ्या सुरत गॅग आणि यूपी गॅग आशी या दोन्ही टोळीची नावे होती.

Related posts

Gandhi Jayanti : राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहून विनोद तावडेंचा ‘आवाज’ चढला

swarit

Kargil Vijay Diwas : थोडक्यात जाणून घ्या…’कारगिल’विषयी

News Desk

FLASHBACK 2018 : सहा महिलांची ‘नाविका सागर परिक्रमा’

News Desk