HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर लोकसभेच्या निकालानंतर होणार कारवाई

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्यासह ५ आमदारांवर कॉंग्रेस कारवाई करणार आहे. परंतु, त्यासाठी आता लोकसभा निवडणुकांच्या निकालाची वाट बघावी लागणार आहे. म्हणजेच २३ मे नंतरच काँग्रेसकडून या आमदारांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. मुंबईत शुक्रवारी (१० मे) झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर पक्षाकडून कठोर कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य ४ आमदारांनी लोकसभेचा निवडणुकांदरम्यान विरोधी पक्षांतील उमेदवारांना मदत केली होती. विखे यांनी भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आपले सुपुत्र सुजय विखे पाटील यांना मदत केली होती. तर नितेश राणे यांनी त्यांचे बंधू निलेश राणे यांचा प्रचार केला होता. आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांचा उघडपणे प्रचार केला. तर जयकुमार गोरे यांनी आघाडी धर्म सोडून भाजपची मदत केली. त्यामुळे कॉंग्रेस या नेत्यांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसप्रमाणे भाजपच्या काही नेत्यांवर देखील पक्षाशी बंडखोरी केल्याचा आरोप होत आहे. उदाहरणार्थ, भाजपचे जालना मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे पाटील आणि शिवाजी कर्डिले यांनी विरोधी पक्षातील उमेदवाराला मदत केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. दरम्यान, भाजपकडून याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार असल्याची माहिती अद्याप अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Aprna

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat

हिवाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर सगळाच मामला थंड; सामनातून राज्य सरकारवर टीका

Aprna