HW News Marathi
राजकारण

राज्यातील सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार !

नागपूर | सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी नेते आणि माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. प्रकल्पाचा निधी वाढवणं, नियमांचा भंग करणं असा ठपका अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 27 पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यात अजित पवार हे सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. ठेका देण्याचे पूर्वनियोजित षड:यंत्र रचणे, प्रकल्पाची किंमत वाढवणे, नियमांचे उल्लंघन करणे, राज्याला प्रचंड नुकसान पोहचवणे असा ठपका अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी कधीही अटक होऊ शकते, असं म्हटलं होतं. सिंचन घोटळ्याप्रकरणी पोलीस अजित पवाराच्या दाराबाहेर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांना केव्हाही अटक होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी वर्तवलेलं भाकीत खरं ठरतं की काय अशी चर्चा रंगू लागली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी

News Desk

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसचा आरोप

News Desk

भावना गवळी यांचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश

Aprna
राजकारण

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

सत्तेवर येताच मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांची सर्व कर्जे माफ करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी काय आकाशातून सूर्य-चंद्रही आणून देतील, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. 2014 साली मोदी यांनी हेच सूर्य-चंद्र जनतेला आणून द्यायचे वचन दिले होते. पण जनतेच्या हातात दगडधोंडेही पडले नाहीत. मोदी यांचाच प्रचार मार्ग राहुल गांधी यांनी स्वीकारला तर काय बिघडले? जात, धर्म, गोत्र, आई-वडील हेच प्रचाराचे मुद्दे ठरत आहेत. नोकर्‍या, भूक, महागाई, दहशतवाद यावर बोलावे असे कुणाला वाटत नाही. आता सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले आहे. यालाच म्हणतात गोंधळाकडून गोंधळाकडे.

सामनाचे आजचे संपादकीय

विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. पण त्यातून फार काही हाती लागेल असे वाटत नाही. 29 तारखेस मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे विधेयक येईल. चर्चा वादळी वगैरे झाल्या तरी ते मंजूर होईल. मराठा आरक्षण झाले तसे मुस्लिमांनाही धर्माच्या नावावर आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे. चंद्रकांत पाटलांनी ती फेटाळून लावली. मुस्लिमांतील मागास जातींना आरक्षण मिळणार आहे व धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही, हे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले हे बरे झाले. धनगर समाजाच्या आरक्षणाचे आता काय व कसे होणार व महादेव जानकर वगैरे मंडळी कोणती भूमिका घेतात यावर लाखो धनगर बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुका लढवण्यासाठी फाटक्या गोधड्यांना ठिगळं लावण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे जनतेला ऊब मिळेल काय? निवडणुकीत आपण जी आश्वासने देतो ती ‘जुमलेबाजी’ ठरू नये याची काळजी यापुढे सगळ्यांनीच घेणे गरजेचे आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी भरमसाट आश्वासने दिली जातात व सत्ता मिळताच त्यांचा विसर पडतो. जनतेला मूर्ख बनवण्याचे हे धंदे आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारात त्याच जुमलेबाजीचा धुरळा उडवला गेला व उद्या महाराष्ट्रातही काही वेगळे घडेल असे आम्हास वाटत नाही. सत्तेवर येताच मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांची सर्व कर्जे माफ करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी काय आकाशातून सूर्य-चंद्रही आणून देतील, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. 2014 साली मोदी यांनी हेच

सूर्य-चंद्र जनतेला आणून द्यायचे

वचन दिले होते. पण जनतेच्या हातात दगडधोंडेही पडले नाहीत. मोदी यांचाच प्रचार मार्ग राहुल गांधी यांनी स्वीकारला तर काय बिघडले! महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला असून जणू राज्यातील सर्व देवदेवतांचाच कोप झाला की काय असे दिसत आहे. शेतकरी-कष्टकर्‍यांचा चंद्र हा त्याच्या कोरड्या भाकरीत होता. दुष्काळामुळे हा चंद्रही लोप पावला आहे. राज्याचे विधानसभा अधिवेशन दुष्काळप्रश्नी कामी लागावे व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा असे आम्हाला वाटते. सरकार आणि विरोधी पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा दुष्काळावर काय उपाययोजना करता येईल, गुरांचा चारा, पाणी, कडबा, शेतकर्‍यांचे सुरू झालेले स्थलांतर यावर काय तोडगा काढता येईल ते पाहावे लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाजूच्या राज्यात प्रचाराचे निमंत्रण आहे. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्याराज्याचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार, धनिक समर्थक यांना भाजपने चार राज्यांत प्रचार कामात जुंपले आहे. एखादे राज्य जरी हातचे गेले तरी आकाश कोसळेल असे सत्ताधार्‍यांना वाटणे हा संसदीय लोकशाहीचा पराभव आहे. फक्त निवडणुकांमागून निवडणुका जिंकायच्या व त्यातच समाधान मानायचे ही एक प्रकारे भांगेची नशा आहे. त्या भांगेसाठी प्रचंड काळा पैसा ओतला जात आहे. मग नोटाबंदीचे काय झाले व सर्वच काळा पैसा खतम करू या घोषणेचे काय झाले? सभा यशस्वी करण्यासाठी गर्दी विकत घेतली जाते. तसे विजयही तराजूत तोलून विकत घेतले जातात. हे आणखी किती काळ चालणार? धर्माचे म्हणाल तर या

देशाला एकमेव धर्म

आहे तो हिंदू धर्म. याचा अर्थ येथे इतर धर्मांना स्थान किंवा महत्त्व नाही असे आम्ही म्हणत नाही. हिंदुत्व ही संस्कृती असून या देशाला मातृभूमी मानणारे सगळेच जण हिंदू संस्कृतीचे घटक आहेत. मग ते मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि आमचे शीख बांधव तर आहेतच आहेत. प्रत्येक धर्माचे हा देश घडविण्यात योगदान आहे. 2014 पर्यंत देशात गवताची काडीही उगवली नाही व सुई धाग्याची निर्मितीही झाली नाही, हे आम्ही तरी मान्य करणार नाही. पण जात, प्रांत, पंथात फाटलेला देश हिंदुत्वाच्या वज्रमुठीनेच एकत्र राहू शकतो हेच आमचे मत आहे. संपूर्ण देशात जातीय मतमतांतराचा जो धुरळा उडाला आहे व त्यातून मने कलुषित झाली आहेत. त्यामुळे देशाला भोके पडत आहेत. त्या भोकांची भगदाडे होऊ नयेत यासाठीच हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आज तरी आहे. लोक जातीपातीचे झेंडे घेऊन मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात. हा आजपर्यंत ज्यांनी राज्य केले त्यांच्या धोरणांचा, योजनांचा व अर्थकारणाचा पराभव ठरतो. काँग्रेसने मागच्या काळात काही केले नाही म्हणून तुमच्या पाच- दहा वर्षांच्या कालखंडात काही करायचे नाही किंवा आज जे बरे झाले नाही त्याचे खापरही मागच्यावर फोडायचे ही राजकीय संस्कृतीच देशाला घातक, मारक ठरत आहे. जात, धर्म, गोत्र, आई-वडील हेच प्रचाराचे मुद्दे ठरत आहेत. नोकर्‍या, भूक, महागाई, दहशतवाद यावर बोलावे असे कुणाला वाटत नाही. आता सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले आहे. यालाच म्हणतात गोंधळाकडून गोंधळाकडे.

Related posts

राममंदिर बाजूला ठेवून पुतळ्याचे लॉलीपॉप, हिंदूंनी सावध राहावे!

swarit

मीच नव्हे तर माझ्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील

News Desk

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटानंतर ठाकरे गटाचा आज टीझर लाँच

Aprna