HW News Marathi
राजकारण

राज्यातील सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार !

नागपूर | सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी नेते आणि माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. प्रकल्पाचा निधी वाढवणं, नियमांचा भंग करणं असा ठपका अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 27 पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यात अजित पवार हे सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. ठेका देण्याचे पूर्वनियोजित षड:यंत्र रचणे, प्रकल्पाची किंमत वाढवणे, नियमांचे उल्लंघन करणे, राज्याला प्रचंड नुकसान पोहचवणे असा ठपका अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी कधीही अटक होऊ शकते, असं म्हटलं होतं. सिंचन घोटळ्याप्रकरणी पोलीस अजित पवाराच्या दाराबाहेर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांना केव्हाही अटक होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी वर्तवलेलं भाकीत खरं ठरतं की काय अशी चर्चा रंगू लागली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवालया हवे होते !

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचा खोटेपणा जनतेसमोर आणला !

News Desk

आधी स्वतःच घर सांभाळा, त्यानंतर देश सांभाळा !

News Desk