HW News Marathi
राजकारण

अजित पवार यांचे सामनाच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अखेर शिवसेनेच्या अग्रलेखाला उत्तर दिले आहे. ‘शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे त्यांच्या नेत्यालाही गेल्या साडेचार वर्षात कळलेले नाही. शिवसेनेची अवस्था बावचळल्यासारखी झाली आहे’, असे अजित पवार म्हणाले आहेत. ‘मी सत्य बोललो त्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत’, अशा शब्दात अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मध्ये लिहिलेल्या आजच्या अग्रलेखामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले होते. सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सामनाच्या अंक जाळण्यात आले आहेत. ‘ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते राम मंदिर काय बांधणार ?’ असा खोचक सवाल विचारत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

सामनाने अजित पवार यांच्याबद्दल नेमके काय लिहिले ?

अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही. अयोध्येत राम मंदिरास विरोध हेच त्यांचे धोरण आहे. अजित पवारांनी प्रभू श्रीरामाचाही अपमान केला. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशा अत्यंत खालच्या पातळीची टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हम तुम एक कमरे में बंद’, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर उद्धव ठाकरेंची टीका

Aprna

मराठा आरक्षणाचा एटीआर विधानसभेत मांडणार

News Desk

‘दैनिक सामना’ मुख्य पानावर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात; राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या

Aprna