HW News Marathi
राजकारण

औरंगाबाद-जालना विधान परिषदेच्या निवडणुकीत अंबादास दानवे विजयी

औरंगाबाद | विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप यांच्यासाठी खूशखबर आहे. विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे विजयी झाला आहे. दानवे ४१८ मतांनी विजयी झाले असून काँग्रेस आघाडीचे भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी यांचा त्यांनी पराभव केला.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक १९ ऑगस्टला मतदान झाले असून आज (२२ ऑगस्ट) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या एका तासात निकाल जाहीर झाला आहे. यात अंबादास दानवे यांना ५२४ मते मिळाली. तर काँग्रेस व राष्ट्रवादीची २५० वर मते मिळाली. बाबुराव कुलकर्णी यांना १०६ तर शहानवाज खान यांना ३ मते व १४ मते बाद झाली आहेत.

निवडणुकीत झालेल्या मतदानात ६५७ पैकी ६४७ मतदारांनी हक्क बजावला, तर १० सदस्य गैरहजर राहिले होते. एमआयएमच्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर शिवसेना-भाजप युतीच्या विजयात एमआयएमचा हातभार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ११ नोव्हेंबरला चक्काजामचा इशारा

Gauri Tilekar

आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी !

News Desk

आज द्रौपदी मुर्मूंच्या राष्ट्रपतीपदाच्या विजयावर होणार शिक्कामोर्तब; देशाला मिळणार दुसरी महिला राष्ट्रपती

Aprna