HW News Marathi
राजकारण

निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर प्रचारबंदी लागू केली !

नवी दिल्ली | “भाजप पश्चिम बंगालला आपल्या इशाऱ्यावर चालवू शकत नाही. पश्चिम बंगाल म्हणजे बिहार किंवा काश्मीर नाही. येथे भाजपमुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर पश्चिम बंगालमध्ये १७ मे ऐवजी १६ मेपासूनच प्रचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे”, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये उद्यापासूनच (१६ मे) प्रचारबंदी लागू करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी बुधवारी (१५ मे) पत्रकार परिषद घेत भाजपसह निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात निवडणुकच्या प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसम संघर्षाने अत्यंत हिंसक वळण घेतले. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार कालावधी संपण्याच्या एक दिवस आधीच निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी (१७ मे) रोजीऐवजी गुरुवारी (१६ मे) रात्री १० नंतरपासून कोणत्याही पक्षाला प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

“अमित शहा आणि नरेंद्र मोदी मला घाबरू लागले आहेत. हा संपूर्ण कट आताचे भाजप नेते आणि माजी तृणमूल काँग्रेस नेते मुकुल रॉय यांनी रचला आहे. केंद्रीय सुरक्षा दलामुळे हा हिंसाचार झाला आहे. निवडणूक आयोगाकडून दोषींविरुद्ध कारवाई देखील केली जात नाही. तर अमित शहांकडून निवडणूक आयोगाला धमकाविले जात आहे”, असेही ममता या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. निवडणूक आयोगाने अमित शहांना नोटीस दिली आहे का ? असा सवालही ममता यांनी यावेळी केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी आमदार संदीप बजोरिया आयकर खात्याच्या रडारवर

News Desk

विधानसभा अध्यक्षांनी ऋतुजा रमेश लटकेंना दिली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Aprna

…तर मी शहांना भेटायला गेल्याच्या बातम्या येतील !

News Desk