HW News Marathi
राजकारण

निवडणुकीपर्यंत अमित शहा यांच्याकडे भाजपचे नेतृत्त्व

नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ ‘मिशन २०१९’साठी वाढविण्यात आला आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आगामी लोकसभा निवडणूक अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखालीच लढली जाईल हे स्पष्ट झाले आहे. जानेवारी २०१९मध्ये शहा यांचा कार्यकाळ संपणार होता. लोकसभा निवडणुकीनंतरच भाजपच्या संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तेलंगणामधील निवडणूक प्रचाराची पहिली सभा अमित शहा यांचीच मेहबूबनगर येथे होणार आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून दोन दिवस भाजपा पक्ष कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उद्या रविवारी पंतप्रधान नरेेंद्र मोेदी संबोधित करणार आहेत. आज अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०१४ पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

साध्वी प्रज्ञा यांनी केला पक्षाची शिस्त पाळण्याचा संकल्प

News Desk

शहीद कर्नल महाडिक यांच्या वर्गमित्रांची सैन्याला अनोखी दिवाळी भेट

Gauri Tilekar

#LokSabhaElections2019 : गोव्यात शिवसेना-भाजपची युती नाही !

News Desk
मनोरंजन

दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश !

News Desk

मुंबई | कोंकणवासीय रेल्वे प्रवाशांना यंदाच्या गणेशोत्सवात मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत दिवा स्थानकात रेल्वेच्या अतिरिक्त ५२ फेऱ्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपती स्पेशल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा न दिल्याच्या निषेधार्थ दिवा स्थानकात रेल्वे प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास करण्याचे ठरविले असताना मध्य रेल्वे प्रशासनाने या निषेध आंदोलनाची दखल घेत तीन नवीन गाड्यांना स्थानकात थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा याकरिता दिवा रेल्वे प्रवासी संघटना गेली अनेक वर्षे रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत होती. मागील दोन वर्षांपासून एक नाममात्र स्पेशल गाडीला दिवा स्थानकात थांबा दिला जात होता.

कोकणात जाणाऱ्या स्पेशल गाड्यांपैकी काही गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा असे पत्र दिनांक १६/०८/२०१८ रोजी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आले होते.

परंतु सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून दिवेकर रेल्वे प्रवासी शनिवार दिनांक ०८/०९/२०१८ रोजी सकाळी दिवा स्थानकातून काळ्या फिती लावून प्रवास करतील असे पत्र नुकतेच प्रवासी संघटनेतर्फे देण्यात आले होते त्या निषेध आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने काल उशिरा काही नवीन गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला.

या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई- रत्नागिरी (०१०३३)
  • लोकमान्य टिळक टर्मिनन्स- झारप (०१०३९/०१०४०)
  • सावंतवाडी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई(०१०३६)

Related posts

#IndependenceDay | मी पंतप्रधान नव्हे तर, प्रधानसेवक !

News Desk

ज्येष्ठ साहित्यिक केशव पुरोहित यांचे निधन

News Desk

पोकळ धमक्या देणारा एक मुलगा

News Desk