HW News Marathi
राजकारण

गरीबांना अजून गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती | अजित पवार

गरीबांना अजून गरीब करणे आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती आहे. त्यामुळे अशा पक्षांना बाजुला करण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मंठा येथे बोलताना केले. हल्लाबोल आंदोलनातील जाहीर सभेत ते बोलत होते.

राज्यात ९ हजार गावे ५० पैशापेक्षा कमी आणेवारीवाली आहेत. त्यातील पाच हजार गावे मराठवाड्यातील आहेत. पण भाजपचे सरकार आल्यापासून त्यांच्या मंत्र्यांना शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात काहीच बदल करता आलेला नाही. भाजपच्या मंत्र्यांनी केवळ जॅकेटची फॅशन आणली, असा खोचक टोमणा त्यांनी त्यांनी सरकारला मारला.

शिवसेना किंवा त्यांच्या प्रमुखांना शेतीतले काय कळते? फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन यांनी सत्ता मिळवली. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काहीही काम केलेले नाही. या नाकर्त्या लोकांना बाजुला करण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन आहे, असे ते म्हणाले.

जालना जिल्ह्यात स्व. अंकुशराव टोपे यांनी सहकारी संस्था उत्तमरित्या चालविण्याचा आदर्श घालून दिला. राजेश टोपे त्यांच्याप्रमाणेच संस्थेचे काम पाहत आहेच. पण जालन्यातील इतर नेत्यांनी मात्र संस्था विकून खाल्ल्या, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की मंठा-परतूर मतदारसंघात होत असलेली सभा ही अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. खाली-वर, इकडे-तिकडे कुठेही नजर मारली तर माणसंच माणसं दिसत आहे. घराच्या छपरावर बसूनही लोक सभेला उपस्थित आहेत. त्यामुळे ‘हवा का रुख बदल गया है’ हेच या सभेचे समर्पक वर्णन करता येईल.

भाजपच्या काळात अनेक मोठ मोठे उद्योग बंद होत आहेत. लोकांचे रोजगार जात आहेत. करोडो रुपये जाहीरातीवर खर्च करुन लोकांना फसवण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे भाजपचे ‘भारतीय जाहीरात पार्टी’ असे आता भाजपचे नामकरण करायला हवे, अशी टीका आमदार राजेश टोपे यांनी केली.

खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. पण अद्याप पिक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. जर लवकर पैसे नाही मिळाले, तर आम्ही हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला.

मंठा येथील हल्लाबोल सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री आ राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, आ. अॅड. जयदेव गायकवाड, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ नरेंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, विजय बोराडे, विलासराव लांडे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी

News Desk

#Article370Abolished Live : कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव शहांनी लोकसभेत मांडले

News Desk

नितेश राणेंकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

News Desk