HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्याआधीच अजित पवारांना क्लीनचिट

पुणे | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (२१ डिसेंबर) अखेरचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार यांसारख्या मुद्द्यांवरील निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान, राज्यातील आणि देशातील अशाच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात देशभरात होणारी तीव्र आंदोलने, एल्गार परिषद, बहुचर्चित अशा सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना मिळालेली क्लीनचिट, फडणवीस सरकारच्या कार्यकाळात कॅगच्या अहवालानुसार झालेला ६५ हजार कोटींचा घोटाळा, भाजप नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महाविकासाआघाडीवरची टीका अशा अनेक मुद्द्यांवर शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.यावेळी, अजित पवारांच्या क्लीनचिटबाबत बोलताना शरद पवार यांनी एक विधान केले आहे. “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच अजित पवारांना क्लीनचिट मिळाली होती”, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • 66 हजार कोटींचा हिशेब प्राप्त झाला नसल्याचे कॅगने म्हटलेले आहे
  • राज्यात असे कधी झाले नव्हते, आर्थिक शिस्त मोडण्याचे काम फडणवीस सरकारने केले.
  • आताच्या सरकारला विनंती आहे की, विशेष समिती नेमून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी.
  • विधानसभा सत्र फक्त 6 दिवसांचे होते.
  • ५ वर्षे सरकार चालवलेल्यांना अशी लगेच कर्जमाफी होत नसते हे समजायला हवे.
  • कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे, आमचे जयंत पाटील, अजित पवार हजर होते. प्रशासकीय अधिकारी होते, त्यांनी काय होऊ शकते हे सांगितले, आम्हीही त्यांच्याशी बोललो. काय होऊ शकते हे बोललो.
  • सरकार येऊन 15 दिवस झाले नाहीत, मला राज ठाकरे यांचे कौतुक वाटत त्यांना इतके समजते.
  • मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा मी वर्षभर टीका केली नाही.
  • अजितच्या संदर्भात सांगायचे झाले तर उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्याआधी त्यांना क्लीनचिट मिळाली होती.
  • या प्रस्तावाला आमचा विरोध, मतदानही विरोधात केले
  • सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता
  • गंभीर प्रश्नांपासून मन वळवण्याची काळजी घेतली जात आहे.
  • गृहमंत्र्यांनी मांडताना घुसखोर शब्द वापरला. तीनच देशांचा उल्लेख केला. एका विशिष्ट समाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
  • महाराष्ट्रात उद्रेक होईल असे वाटले नव्हते.
  • 8 राज्यांनी कायदा स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली.
  • 8 वे राज्य बिहार आहे, ते एनडीएचे प्रतिनिधी आहे.
  • आपल्या देशात केंद्राची जबाबदारी आहे की राज्य आणि केंद्र समनवयाने चालावे मात्र तशी केंद्राची इच्छा नाही
  • सामाजिक कार्यकर्ते , साहित्यिक यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे. नामदेव ढसाळ यांचा गोलपीठा सगळ्यांनी वाचला आहे, त्यात त्यांनी असंतोष मांडला आहे. यावेळी त्यांनी ढसाळ यांच्या ‘रक्ताने पेटलेल्या अगणित सुर्यांनो ‘ कवितेचे वाचन केले.
  • सुधीर ढवळे यांनी वाचलेल्या दोन ओळींसाठी तुरुंगात ठेवले हा सत्तेचा गैरवापर आहे. त्यांनी वाचलेल्या जर्मन कवितेचे हिंदीतून वाचनही पवार यांनी केले.
  • टीका केली म्हणून राष्ट्रद्रोह म्हणणे योग्य नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेश विसर्जनाची ही पद्धत कोणती?, नवनीत राणा झाल्या ट्रोल

Manasi Devkar

सरकारच्या हस्तक्षेपामुळे सुब्रम्हण्यम स्वामी नाराज

Gauri Tilekar

शिवस्मारक बांधण्याआधी खर्च वसुलीचे सरकारला कोडे

News Desk