HW News Marathi
राजकारण

भीमा-कोरेगाव विजय दिवसाच्या निमित्ताने प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

पुणे | भीमा-कोरेगावच्या रणसंग्रामात मिळालेल्या विजयाच्या निमित्ताने भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजय दिवस साजरा केला जातो. या दिवसासाठीच्या तयारीला आता प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. या दिवशी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. हे लक्षात घेऊन लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून पिण्याचे पाणी, वाहतूक, स्वच्छतागृह इत्यादींची सुविधा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे येथील गर्दीचे नियोजन करण्यासाठी बॅरीकेट्ससह सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २५ हूनही अधिक रुग्णवाहिकांची सोय करण्यात येणार आहे. मागील वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात आहे.

कोरेगाव भीमा येथील विजय दिवसाला राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक बोलावली होती. येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छतागृहांचे योग्य नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे स्टॉलवरील अन्नपदार्थ हे भेसळयुक्त नसतील याची काळजी घेण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“नागाला कितीही दूध पाजले तरी चावायचा तो चावतोच”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Aprna

संबित पात्रांच्या व्हिडीओमुळे मोदी सरकारची उज्ज्वला योजना गोत्यात

News Desk

विधानसभा अध्यक्षानंतर आता विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता

News Desk
देश / विदेश

कर्नाटकमधील मंदिरात प्रसादातून विषबाधा, १३ जणांचा मृत्यू

News Desk

नवी दिल्ली | कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील सुलीवादी गावात गुरुवारी (१४ डिसेंबर) मरम्मा मंदिराच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमादरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादातून १३ जणांना विषबाधा झाली आहे. तर ११ जणांची प्रकृती गंभीर असून जवळपास ९० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मंदिर व्यवस्थापनाच्या दोन २ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी रुग्णालयात जाऊन या विषबाधा पीडितांची भेट घेऊन त्यांच्यावरील उपचारांबाबत देखील आदेश दिले आहेत.

या प्रसादाचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रसादामुळे लोकांना उलट्या आणि पोटदुखी सुरु झाली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या संपूर्ण प्रकारची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

Related posts

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या सुरक्षेत वाढ, पुरोगामी विचारवंतांच्या सुरक्षेत केली वाढ

News Desk

अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्यामागचे हे कारण तुम्हाला माहीत आहे का?

News Desk

आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन! – मुख्यमंत्री

Aprna