HW News Marathi
राजकारण

विरोधी पक्ष नेत्यांची वाढलेली जवळीक ठरणार भाजपच्या धास्तीचे कारण

जयपूर | मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतर या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा देखील सुटला आहे. आज (१७ डिसेंबर) या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा आयोजित केलेला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते देखील या तिन्ही राज्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले असून या सर्व नेत्यांनी राहुल यांच्यासह एकाच बसमधून प्रवास केला आहे. दरम्यान, सर्व विरोधी पक्षांशी एकमेकांशी वाढत चाललेली जवळीक भाजपसाठी मात्र मोठे धास्तीने कारण ठरत आहे.

यावेळी राहुल गांधींसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, एलजेडीचे शरद यादव, डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रवास केला. विरोधी पक्षांचे एकमेकांशी जेवढे जास्त संबंध येतील तेवढे ते भाजपसाठी येत्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरणार आहेत. त्याचप्रमाणे तीन अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसने धूळ चारल्यानंतर भाजपच्या चिंतेत आधीच मोठी वाढ झाली आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी सरकारला शह देण्यासाठी काँग्रेस पक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. याचसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात महाआघाडी तयार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे घेणार गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन

News Desk

फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे | मुंडे

News Desk

“महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर लोकसभेत खडाजंगी

Aprna