HW News Marathi
राजकारण

लोकांची दिशाभूल करणे ही भाजप सरकारची पद्धत !

नवी दिल्ली । काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “काँग्रेस पक्ष हा भाजपच्या विचारधारेला मात देत आहे. काँग्रेस हा असा एकमेव पक्ष आहे जो संपूर्ण देशाला एक क्षेत्र मानतो”, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

सोनिया गांधींनी देखील यावेळी भाजपवर टीका केली आहे. “लोकांची दिशाभूल करणे आणि घाबरविणे ही भाजप सरकारची पद्धत आहे”, अशी बोचरी टीका यावेळी सोनिया गांधी यांनी केली आहे. “देशातील बेरोजगारी, नोटबंदी आणि राफेल करार घोटाळा यामुळे मोदी सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे”, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राफेल प्रकरणी राहुल गांधीसह कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारवर वारंवार विविध आरोप केले होते. रिलायन्स कंपनीला विमान निर्मिती क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना त्यांना राफेलचे कंत्राट देण्यात आल्याने राहुल गांधीकडून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला फसविल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा आझाद यांचा आरोप

News Desk

राफेलवरून संसदेत गदारोळ, राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार

News Desk

तुम्ही कधी आमदार फोडलेत का?, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या…

Aprna