HW News Marathi
राजकारण

भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी घातले लोटांगण

पुणे | पुण्यातील हडपसर परिसराचे आमदार योगेश टिळेकरानी त्यांच्यावर असलेला खंडणीचा आरोप मागे घ्यावा म्हणून चक्क ज्याने तक्रार केली त्याच्या पुढे लोटांगण घातल्याची बाब समोर आली आहे. या लोटांगणाचा सीसीटीव्ही फुटेज फ़र्यादी रवींद्र बऱ्हाटे यांनी सादर केले आहे . या फुटेजमध्ये आमदार योगेश टिळेकर हे खंडणीची गुन्हा मागे घेण्यासाठी बऱ्हाटे यांच्या हातापाया जोडताना दिसत आहेत.

दरम्यान, तक्रारदार रवींद्र बर्‍हाटे यांच्या तक्रारीवरून आमदार टिळेकर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आमदार टिळेकर यांनी खंडणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच रवींद्र बर्‍हाटे हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असल्यानेच आपण त्यांना नतमस्तक झालो, असेही योगेश टिळेकर यांनी सांगितले आहे.

आमदार टिळेकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यामुळे टिळेकरांच्या अडचणींत वाढ झाली आहे. त्यामुळे ते आता माझ्या हातापाया पडत असल्याचा दावा रवींद्र बर्‍हाटे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरेंच्या अल्टिमेटनंतर माहिम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर BMC ची कारवाई

Aprna

फलटणमध्ये उदयनराजेंविरोधात घोषणाबाजी अन् कडकडीत बंद

News Desk

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

News Desk
क्रीडा

तिरुवनंतपुरममध्ये भारतीय क्रिकेट संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत

Gauri Tilekar

नवी दिल्ली | तिरुवनंतपुरममध्ये भारत आणि वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यासाठी तिरुवनंतपुरम येथे दाखल झालेल्या भारतीय क्रिकेट संघाचे आज चाहत्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत झाले आहे. तिरुवनंतपुरम येथे खास पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवत भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. भारतीय संघाने तिरुवनंतपुरम येथील हा निर्णायक सामना जिंकला तर भारताला ही मालिका जिंकता येणार आहे.

भारत-वेस्ट इंडिजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या दमदार कामगिरी नंतरही भारताला विजय मिळविता आला नव्हता. पुणे येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली होती. तर मुंबईत झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने पुन्हा वेस्ट इंडिजला हरवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

Related posts

दुखापतीमुळे राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला

News Desk

बीसीसीआयकडून हार्दिक पंड्या-लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई

News Desk

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराला सुरुवात

News Desk