HW News Marathi
राजकारण

भाजप कडून बलात्का-यांची पाठराखण | राज ठाकरे

मुलुंड |भारतीय जनता पक्ष बलात्का-यांच्या पाठीशी उभा रहात आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुलुंडच्या सभेत भाजप सरकारवर केला. कठुआ हत्या आणि बलात्कार प्रकरणी बोलताना राज म्हणाले, एका ८ वर्षाच्या मुलीवर कश्मीर मध्ये बलात्कार झाला प्रचंड राग आला. देशाची विचारसरणी बदलली आहे. राजकीय पक्षांना काय हवय ते माहीत नाही पण भाजपला काय हवय ते मला नक्कीच माहीत आहे असे यावेळी बोलताना राज म्हणाले.

असिफावर अत्यंत अमानुषपणे मंदिरात बलात्कार करुन तिची हत्या झाली तेव्हा आमचे देव पण कुठे होते काय माहीत. आरोपींना अटक झाल्यानंतर भाजपचे लोक आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करतात हे दुर्दैवी आहे. मोदी सरकारमध्ये हिंम्मत असेल तर त्यांनी भारतात असलेले बांग्लादेशी हकलून द्यावेत. निवडणूका जवळ आल्यामुळे सरकार कोणत्याही प्रकराणाचे भांडवल करत आहे असा आरोप राज यांनी यावेळी भाजपवर केला.

देशाला धोका भारतात घुसलेल्या पाकिस्तानी मुस्लिमांपासून आहे चिमुरड्या असिफा पासून नाही. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. भाषणात फक्त नरेंद्र मोदी सांगतात पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर मिळेल प्रत्येक्षात मात्र असे काहीह होत नाही. निवडणूका जवळ आल्या आहेत म्हणून दलित मतांसाठी आपण बाबासाहेबांमुळे पंतप्रधान झाल्याचा साक्षात्कार नरेंद्र मोदी यांना साडेचार वर्षानंतर झाला आहे. राजीव गांधी यांच्या नंतर पहिल्यांदा बहुमत नरेंद्र मोदींना मिळाले पण मोदी पंतप्रधान असून चक्क आंदोलनाला बसले मला माहीत नव्हते पंतप्रधान झाल्यानंतर असे वागतील. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अपेक्षा भंग झाल्याच्या सुरात राज यांनी सरकारवरील नाराजी व्यक्त केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उत्कृष्ट गणेशोत्सव’ स्पर्धेसाठी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Aprna

राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली !

News Desk

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या | खा. अशोक चव्हाण

News Desk