HW News Marathi
राजकारण

आता भाजपचा स्वबळाचा नारा

लातूर । आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रथमक आक्रमक भूमिका घेत स्वबळाचा नारा दिला आहे. भाजममध्ये आज (६ जानेवारी) हा नारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. लातूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे दोघेही म्हणाले आहेत.

शिवसेना नेहमीच स्वबळाचा नारा देते. सेनेच्या भूमिकेला आता भाजपने देखील स्वबळाचा नारा देत सडेतोड उत्तर दिले आहे. लातूरच्या मेळाव्यात भाजपच्या बूथ विजय अभियानाचा श्रीगणेश केला आहे.

अमित शहा यांचा स्वबळाचा नारा

युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे.

युतीच्या संभ्रमात राहू नका

लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील ४८ पैकी ४० जागा जिंकू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. युतीच्या संभ्रमात राहू नका, तुम्ही तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचे संकेत दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

‘हिट’ मारल्यानंतर किती डास मेले ते मोजत बसू की, आरामात झोपू ?

News Desk

तासगाव नगरपालिकेसमोर भर पावसात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे उपोषण

News Desk