HW News Marathi
राजकारण

भाजपने साध्वी प्रज्ञा यांची पक्षातून हकालपट्टी करून राजधर्म निभवावा !

नवी दिल्ली | साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर नोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी देखील या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपला सुनावले आहे. “गोडसेने केवळ महात्मा गांधींच्या शरीराची हत्या केली होती. मात्र, साध्वी प्रज्ञासारखे लोक त्यांच्या आत्म्यासह भारताच्या आत्म्याची देखील हत्या करीत आहेत. भाजपने त्यांना होणाऱ्या थोडक्या फायद्याचा विचार सोडून त्यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करून राजधर्म निभवावा”, अशा आशयाचे ट्विट कैलास सत्यार्थी केले आहे.

“गोडसेने केवळ महात्मा गांधींच्या शरीराची हत्या केली. मात्र, साध्वी प्रज्ञासारखे लोक त्यांच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करीत आहेत. महात्मा गांधी या सर्व सत्ता आणि राजकारणाच्या पलीकडे आहेत. भाजपने त्यांना होणाऱ्या थोडक्या फायद्याचा विचार सोडून त्यांची (साध्वी प्रज्ञा) पक्षातून तात्काळ हकालपट्टी करून राजधर्म निभवावा”, असे ट्विट कैलास सत्यार्थी यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk

“दुश्मन का दुश्मन दोस्त होता है”; अनिल परबांचे बच्चू कडू यांच्यासंदर्भात सूचक विधान

Darrell Miranda

राष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव शरद पवार यांनी नाकारला

Aprna