HW News Marathi
राजकारण

भाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली शंका

नवी दिल्ली | “राहुल गांधी हे नक्की भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक आहेत ?”, असा सवाल भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला आहे. “२०१४ साली राहुल गांधी यांनी स्वत:ला ब्रिटिश नागरिक म्हणवून घेतले होते. आता राहुल गांधी यांनी स्वतःच सांगावे कि ते भारतीय नागरिक आहेत कि ब्रिटिश नागरिक आहेत”, असे म्हणत भाजपने थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, काँग्रेसकडून अद्याप यावर कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.

अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी राहुल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांचे खरे नाव राऊल विंची असून त्यांनी फसवी कागदपत्रे सादर करून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप ध्रुवलाल कौशल यांच्या वकीलांनी केला आहे. “निवडणुकांसाठी राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला त्यावेळच्या कागदपत्रांनुसार राहुल हे ब्रिटिश नागरिक असल्याचे समोर येत आहे”, असे देखील नरसिम्हा राव यांनी म्हटले आहे. राहुल हे भारतीय नागरिक आहेत किंवा नाही हे स्पष्ट करण्यासाठी राहुल गांधी यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप सरकारला खडयासारखे बाजूला केल्याशिवाय गप्प बसायचे नाही !

News Desk

धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

News Desk

आघाडीत एमआयएम, मनसेला स्थान नाही!

News Desk