HW News Marathi
राजकारण

हा तर धनशक्तीचा विजय !

सांगली | सांगली, जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीचा ३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. यावेळी भाजपाचा सांगलीमध्ये दणदणीत विजय झाल्याचे पहायला मिळाले. यावर प्रतिक्रीया देताना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील म्हणाले, सांगलीतील भाजपाचा विजय हा भाजपचा धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय आहे.

सांगली महापालिकेची निवडणुक शिवसेनेने प्रथमच लढली. त्यात २२ जागा रेसमध्ये होत्या त्यातील १०-१२ जागांवर विजय मिळेल, असा विश्वास होता. मात्र निकाल अनपेक्षित लागला, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, या निवडणुकीसाठी आम्ही सर्व ताकद लावली होती परंतु नेमके कुठे आणि काय चुकले, याचे आत्मचिंतन करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युट्युब चॅनेल विरोधात विखे पाटलांची पोलिसात तक्रार

News Desk

लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला का केलं नाही? तेव्हा सरकार कोणाचं होतं?; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Aprna

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मोठी घोषणा

News Desk