HW News Marathi
राजकारण

विकास करता आला नाही म्हणून भाजपने राम मंदिराचा मुद्दा उकरून काढला !

नवी दिल्ली | “साडेचार वर्षांत काहीच विकास करता आला नाही. त्यामुळेच भाजपने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उकरून काढला”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर २०१४ ची निवडणूक जिंकली मात्र त्यांना या साडेचार वर्षात काहीच विकास करता आला नाही. म्हणूनच भाजपने राम मंदिराचा मुद्दा उकरून काढल्याचे भुजबळ म्हणाले.

“आगामी लोकसभा निवडणूक म्हणजे मोदी विरुद्ध संविधान अशी लढाई आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज ठाकरे यांच्याही सहकार्याची गरज आहे. जागा किती मिळतील याचा विचार करण्यापेक्षा मोदींचा पराभव हा उद्देश ठेवून सर्वांनी आघाडीत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले.

अनुभवाने गर्दी आणि दर्दी यातील फरक ओळखता येतो. मोदी सरकारच्या विरोधात किती असंतोष आणि रोष आहे हे परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून दिसले आहे. आता केवळ मतविभाजन टाळण्याची गरज आहे. कोणाची किती ताकद आहे यापेक्षा कोणाची किती मदत मिळेल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुस्लिम समाजाने आता वाघ व्हावे !

News Desk

मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार! – उपमुख्यमंत्री 

Aprna

“महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात सीमावादचे प्रकरण जिंकेल”, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

Aprna