HW News Marathi
राजकारण

केंद्राने मोदींना वाचविण्याकरिता लोकपाल लागू केला नाही, काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाचविण्याकरिताच केंद्राने लोकपाल कायदा लागू केलेला नाही. जर हा कायदा लागू झाला असता तर राफेल विमान करार प्रकरणी पहिले आरोपी नरेंद्र मोदी हेच ठरले असते”, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेचे वीरप्पा मोईली यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे वारंवार राफेल विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका करत आले आहेत. “मोदी आज वाचू शकतात, पण उद्या नाही”, असेही मोईली यावेळी म्हणाले.

”केंद्राची संरक्षण क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद ही चीनच्या तरतुदीचा केवळ पाचवा भाग आहे. त्यातील २० टक्के रक्कम ही राफेल विमान खरेदीसाठी खर्च होईल. त्यातून सरकारचा कमकुवतपणा उघड होईल. जर लोकपाल विधेयक लागू झाले तर पंतप्रधान मोदीच पहिले आरोपी ठरतील याचसाठी सरकार लोकपाल विधेयक लागू करत नाही”, असे मोईली यांनी म्हटले आहे.

”पंतप्रधान मोदी लोकांविरोधात इडी आणि सीबीआयचा वापर करत आहेत. काँग्रेस पक्ष राफेल किंवा अन्य कुठल्याही शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याविरोधात नाही. परंतु, ७० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या एचएएल कंपनीकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही ”, असेही मोईली म्हणाले. पंतप्रधान मोदींनी राफेल कंत्राट एचएएल कंपनीला न देता या क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिल्याने राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक येताच सेना-भाजप श्रीरामच्या भूमिकेत दिसतात !

Gauri Tilekar

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेली समिती सरकारच्या हातचे बाहुले | राजू शेट्टी

News Desk

भाजप आरपीआयला सत्तेवर आणा !

News Desk