HW News Marathi
राजकारण

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी चंद्राबाबूंचे उपोषण

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न देण्याच्या सरकारच्या भूमिकेला निषेध दर्शविण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज (११ फेब्रुवारी) दिल्लीत एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मजीद मेमन हे देखील उपस्थित राहिले आहेत.

चंद्राबाबू नायडू यांनी अनेकदा आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी केली आहे. तेलगू देसम पक्षाच्या बैठकीत या उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे सोमवारी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली आहे.

मागण्या कशा पूर्ण करायच्या ते आम्ही चांगेलच जाणतो !

‘तुम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या ते आम्ही चांगलेच जाणतो. हा आंध्र प्रदेशामधील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जर आमच्या स्वाभिमानावर हल्ला झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि विशेषतः पंतप्रधानांना चेतावणी देतो की त्यांनी एकट्यावर हल्ला करणे थांबवावे’, असा थेट इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वेदांता प्रकल्पावरुन सुधीर मुनगंटीवारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

Darrell Miranda

स्वातंत्र्यवीर सावरकरासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले…

Aprna

Sharad Pawar ED Case | पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

News Desk