राजकारण
आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी चंद्राबाबूंचे उपोषण

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न देण्याच्या सरकारच्या भूमिकेला निषेध दर्शविण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज (११ फेब्रुवारी) दिल्लीत एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मजीद मेमन हे देखील उपस्थित राहिले आहेत.
Delhi: Former Prime Minister & Congress leader Manmohan Singh at Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu's day-long fast, at Andhra Pradesh Bhawan. pic.twitter.com/wEym76Hftk
— ANI (@ANI) February 11, 2019
चंद्राबाबू नायडू यांनी अनेकदा आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी केली आहे. तेलगू देसम पक्षाच्या बैठकीत या उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे सोमवारी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली आहे.
Congress President Rahul Gandhi: I stand with the people of Andhra Pradesh. What kind of a PM is he? He did not fulfill the commitment made to the people of Andhra Pradesh. Mr Modi, tells a lie wherever he goes. He has got no credibility left. pic.twitter.com/LdW5923O4T
— ANI (@ANI) February 11, 2019
मागण्या कशा पूर्ण करायच्या ते आम्ही चांगेलच जाणतो !
‘तुम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या ते आम्ही चांगलेच जाणतो. हा आंध्र प्रदेशामधील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जर आमच्या स्वाभिमानावर हल्ला झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि विशेषतः पंतप्रधानांना चेतावणी देतो की त्यांनी एकट्यावर हल्ला करणे थांबवावे’, असा थेट इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
पुलवामाच्या गुन्हेगारांना कशी, कुठे, शिक्षा द्यायची ते आमचे जवान ठरवती !

यवतमाळ | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१६ फेब्रुवारी) यवतमाळमधील पांढरकवडा येथे मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. “मी तुम्हाला सांगतो की, जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. ज्या दहशतवादी संघटनांनी हा हल्ला केला आहे. तुम्ही थोडा धीर धरा, आपल्या जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना काही झाले सोडणार नाही, पुलवामाच्या गुन्हेगारांना कशी, कुठे, शिक्षा द्यायची ते आमचे जवान ठरवती,” असे मोदींनी सभा संबोधित करताना म्हणाले आहे.
Prime Minister Narendra Modi in Yavatmal, Maharashtra: Terror organisations who have committed this crime, no matter how much they try to hide, they will be punished. Security forces have been given full freedom. #PulwamaAttack pic.twitter.com/ULPOSUH3w2
— ANI (@ANI) February 16, 2019
पांढरकवडा तालुक्यातील रामदेवबाबा मैदानावर आयोजित मोदींच्या सभेसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या सभेत मोदी म्हणाले की, ” पुलवामा झालेल्या हल्यानंतर संपूर्ण देशभारत संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांविरोधात आम्ही शोध मोहिम हाती घेतली असून मला देशातील भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास आहे आणि खास करून देशातील सीआरपीएफ जवानांमध्ये जास्त क्रोध आहे. दहशतवाद्यांना कारवाई करण्यासाठी भारतीय जवानांना मी स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
Prime Minister Narendra Modi in Yavatmal, Maharashtra: I know that we are all in immense pain after what happend in Pulwama, I understand your anger. Two sons from Maharashtra lost their lives in the attack, their sacrifice won’t go in vain. #PulwamaAttack pic.twitter.com/y9iyREgr9W
— ANI (@ANI) February 16, 2019
यंदाच्या बजेटमध्ये शेतकरीबरोबरच गोमांत समाजातील बजारा, श्रमिक समाज आणि शेतमुंजर यांच्यासाठी मोठ्या योजना यांची घोषणा करण्यात आल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या नावाने शेकऱ्यांसाठी मदत करणारी योजना आणली आहे. ज्या शेतकऱ्यांना ५ एकरपेक्षा कमी जमिन असेल त्यांच्यासाठी वर्षी ६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
यावेळी २०१४ मध्ये याच मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला येऊन गेल्याचे मोदींनी आठवण करून दिली आहे. दाभडीला शेतक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे मोदी यांनी सांगितले. गेल्या साडेचार वर्षात शेकडो योजनांचा शिलान्यास केल्याचे मोदी म्हणाले. आदिवासी मुलांनी एव्हरेस्ट सर केल्याचे सांगितले.
तसेच पंतप्रधान आवास योजने अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील दोन महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुलाच्या चाबीचे वितरण करण्यात आले. शिवाय गवंडी कामाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कारागिरांना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी नागपुरातील अजनी ते पुणे या हमसफर एक्सप्रेसचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्याचे थेट प्रेक्षपण करण्यात आले. बचत गटासाठी भाजपा सरकारने आणलेल्या योजनांची चित्रफित कार्यक्रमस्थळी दाखविली जात आहे.
महाराष्ट्र
पांढरकवडात पंतप्रधान मोदींविरोधात “मोदी गो बॅक”चे पोस्टर

यवतमाळ | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१६ फेब्रुवारी) नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यवतमाळमधील पांढरकवडा येथे मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये मोदी पांढरकवडा येथे महिला बचतगटाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. मोदींच्या दौऱ्यापूर्वी यवतमाळमधील पांढरकवडा येथे “मोदी गो बॅक” अशी फलके लावण्यात आले आहे. युवा काँग्रेसने ही फलके लावल्याचे सांगितले जात आहे. मोदींनी “चाय पे चर्चा” कार्यक्रमातून देशातील शेतकऱ्यांना मोदींनी अनेक आश्वासने दिली होती, परंतु ती आश्वासने त्यंनी पाळली नाही, त्या निषेधार्थ हे फलक लावले गेले.
Maharashtra: PM Narendra Modi arrives in Nagpur. He will launch multiple projects in the state today. pic.twitter.com/PU6EOvshRp
— ANI (@ANI) February 16, 2019
मोदींच्या हस्ते विदर्भ आणि खान्देशात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते एकलव्य मॉडेल स्कूलचे उद्घाटन होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात येतील. अजनी (नागपूर) ते पुणे रेल्वेचा ई-शुभारंभ, ग्रामोन्नती योजनेतील लाभार्र्थींना धनादेशाचे वाटप होणार आहे. त्यानंतर ते बचतगटांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित असतील.
-
देश / विदेश2 days ago
#PulwamaAttack : ४० जवान शहीद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांनी केला निषेध
-
राजकारण2 days ago
युतीच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर दाखल
-
देश / विदेश1 day ago
#PulwamaAttack : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर
-
देश / विदेश1 day ago
#PulwamaAttack : जाणून घ्या… ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ म्हणजे काय ?
-
देश / विदेश23 hours ago
#PulwamaAttack : मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत
-
News Report2 days ago
NCP Meeting Finished in Mumbai | राष्ट्रवादीची खलबतं, मोदींना देणार कडवी झुंज
-
देश / विदेश22 hours ago
#PulwamaAttack : पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली
-
राजकारण1 day ago
#PulwamaAttack : हे ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांचे अपयश !